मुख्य सामग्रीवर वगळा

पुस्तक-तीन शिल्पकार. लेखक-अरुण कुलकर्णी.

पुस्तक-तीन शिल्पकार. लेखक-अरुण कुलकर्णी.



आज पहाटे एक छोटंसं पुस्तक वाचून संपवलं,पुस्तक जितकं छोटंसं होतं तितकंच सुंदर अन् थोडक्यात खूप काही सांगून जाणारं आणि हवंहवंसं वाटणारं असं हे पुस्तक होतं..!

"अरुण कुलकर्णी" लिखित "तीन शिल्पकार" हे "६५" पानांचं छोटंसं पुस्तक आज वेळ भेटेल तेव्हा वाचून संपवलं.म्हणजे सलग वाचत बसले तर तासाभरात हे पुस्तक पूर्ण होईल असं हे पुस्तक आहे..!

सर्वप्रथम सांगायला आवडेल की जी चित्रकार लोकं आहेत त्यांनी हे पुस्तक आवर्जून वाचायला हवं..!
ज्याप्रमाणे लेखक कुठेही गेला की त्यांच अंतरमन त्याला नेहमीच सभोवताली दिसणाऱ्या निसर्गाबद्दल,त्याच्या सभोवताली घडणाऱ्या घटनांबद्दल आपल्या लेखणीत काही कैद करून ते शब्दरुपात उतरवता येईल का हा विचार करायला लावत असतं.अगदी त्याचप्रमाणे चित्रकारसुद्धा असाच विचार करत असतो की माझ्या अंतरमनात चित्राची मी तयार केलेली जीवंत फ्रेम मला कुठे भेटेल का अन् मी स्टॅण्ड लावून केव्हा ती जीवंत फ्रेम मला भेटल्यावर तिला मी केव्हा कॅनव्हासवरती उतरवेल..!

तर अश्या चार चित्रकारांची परंतु त्यातील एकाच चित्रकाराची कथा सांगणारे हे छोटंसं पुस्तक.
साधारण सुरुवात अशी आहे की,हे चार मित्र निसर्गाच्या सान्निध्यात राहून आपल्याला काही सुंदर चित्र काढता येईल का हा विचार करता.त्यासाठी ही मित्र कोकणातील समुद्र किनाऱ्यावर आपलं काही दिवसांचे वास्तव्य कँपमध्ये करतात.सभोवताली असलेल्या निसर्गाला आपल्या सुंदर सुंदर चित्रामध्ये ते उतरवतात..!

यातील एका मित्राला पुस्तकाच्या शीर्षकातले ते "तीन शिल्पकार" भेटतात अन् मग त्यातील एका चित्रकाराचा प्रवास सुरू होतो.त्याला एक कुटुंब भेटतं.झोपडीवजा असलेलं त्यांचे घर,त्यात त्या स्त्रीच्या,तरुण मुलीच्या अन् त्या माणसाच्या अंगावर असलेले मोजके कपडे,त्यांच्या त्या जगण्याला घेऊन असलेल्या खूप कमी गर्जा,त्यांना नकोसा वाटणारा पैसा,नदीच्या पाण्यात मासे पकडून त्यांचा चालणारा उदरनिर्वाह,त्या माणसाचे रापलेले अन् पिळदार शरीर,त्या तरुणींचं अन् त्या बाईचे सावळे अंग परंतु मनाला मोहून टाकणारी शरीरयष्टी,शरीरावर असलेली ती आकर्षित वळणं,गरीब असूनही त्यांना मिळालेलं सौंदर्य,त्यांना नसलेली कुठली लज्जा कारण या गोष्टीचा त्यांच्या आयुष्यात नसलेला कुठलाही लवलेश,देवावरची त्यांची श्रद्धा,त्या चित्रकाराला आपल्या घरातील सदस्यासारखे समजणे त्याला मदत करणे..!

मग चित्रकाराने त्यांचे चित्र काढणे,त्याचे प्रदर्शन भरवणे,तो खूप मोठा चित्रकार होणे दोन-तीन वर्षांनी तो पुन्हा या कुटुंबाला भेटायला म्हणून पुन्हा त्याच जागेवर जाणे परंतु त्यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस होणे.गावाला पुर येणे अन् त्यांची झोपडी वाहून जाणे,यात ते तिथून नाहीसे होणे अन् खूप काही सांगणारा हा प्रवास आहे..!

आयुष्याची कित्येक गणितं शिकवणारे हे छोटेसे पुस्तके नक्कीच सर्वांनी वाचायला हवं आहे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...