मुख्य सामग्रीवर वगळा

माझी सायंकाळ..!

माझी सायंकाळ..!

सायंकाळची वेळ पावलं या छोट्या छोट्या टेकड्यांकडे कुच करतात,मनात असंख्य प्रश्न असतात,रस्त्यानं अनेक अनोळखी चेहरे दिसत असतात.कधीतरी मनात विचार येऊन जातो की या अनोळखी व्यक्तींशी आपल्या मनातल्या भावना व्यक्त कराव्या,बोलतं व्हावं त्यांच्याशी.परंतु पुढच्या क्षणाला हे ही कळून चुकते की,जितका सहज आपण विचार करतो तितकं सहज हे जग नाही,या जगाची अन् जगण्याची येथील माणसांची रित खूप वेगळी आहे..!

मग कित्येकदा आपल्याच मनाच्या प्रश्नांना आपणच उत्तर द्यावी,वेड्या मनाला समजूत घालावी अन् आजची सायंकाळ,आजच आपलं संपू्ण जाणं उद्यावर येऊन ठेपल्या जातं इतकंच.छान असतं हे आपल्या विश्वात आपण रममाण राहून आपली प्रश्न सोडवणे.अस्ताला जाणारा सूर्य जसजसा अस्ताला जात असतो तसेतसे आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलत जातो अन् काळोखात आपल्या आयुष्यात उद्याची कोवळी किरणं आजच्या सांजेला येऊ बघतात..!

इतकंच..!
मनाची असलेली अवस्था लिखाणात कैद करणं फार अवघड म्हणून अलीकडे त्या अवस्थेला घेऊन लिहने टाळतो.

छान आहे अस्ताला जाणारा सूर्य,सांजेच्या वेळी आसमंतात घिरट्या घालणारे पक्षी,दूरवर आपल्या विचारात मग्न राहून सायंकाळी फिरायला येणारे वाटसरू,स्ट्रीट लाईटच्या उजेडात आपलं अस्तित्व शोधणारी माझ्यासारखी एकावेळी दोन आयुष्य जगणारी मित्र,वाऱ्याच्या झुळकेने हवेच्या तालावर नाचत असणारं तृण,निळसर छटा असलेली आकाशी सुंदर फुलं,लाल मातीची अन् काळया खडकांची टेकडी अन् टेकडीच्या उतारावर दूरपर्यंत दिसणाऱ्या पायवाटा ओळखीच्या असूनही अनोळखी भासणाऱ्या..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...