मुख्य सामग्रीवर वगळा

पुस्तक-माहेरी गेली, धर्मा गोविन्द..!

पुस्तक-माहेरी गेली-धर्मा गोविन्द.


काल "धर्मा गोविन्द" लिखित "माहेरी गेली" हे "११६" पानांचे पुस्तक पहाटे दोनच तासात वाचून संपवले अन् एक अनामिक ओढ मॉरिशिसमध्ये वास्तव्य करणाऱ्या मराठी बांधवांची लागली,
हे सर्व का..?

याला उत्तर नव्हते,पुस्तकाबद्दल काय लिहावं हे ही समजत नव्हते.कथा फार काही विशेष अशी नव्हती पण एका आगळ्या वेगळ्या धाटणीची होती,त्यामुळं थोडक्यात काहीतरी माहितीपूर्ण लिहावं हा विचार मनात येऊन गेला..!

परंतु लिहावं तरी काय..?
हा प्रश्न होता मग ठरवूनच प्र.श्री.नेरूरकर यांनी पुस्तकात मोरस मराठी आणि मॉरिशिसमधील मराठी भाषिक लेखन याबद्दल जे काही लिहले आहे ते येथे लिहावेसे वाटले..!

"माहेरी गेली" ही धर्मा गोविन्द यांची कहाणी मॉरिशिस बेटावरील पूर्वेकडील अशा एका घनदाट अरण्यग्रस्त काळ्या नदीच्या परिसरात घडते.की ती स्थलकाळपात्रे या संदर्भात समजून घेण्यासाठी मॉरिशिस  बेटाची,सभोवतालची भौगोलिक रचना सुबुद्ध वाचकाने समजून घेणे आवश्यक आहे..!

तामरिन वे किंवा तामरिन किंवा तामार खेडे गावातील मोर्णे,शामारेल,बे ज्यूकॅम्प या घनदाट व हिंदी महासागराला रुद्रभीषनपणे भिडलेल्या पहाडी भागात धर्मा गोविन्द यांच्या कथेतील मराठी पात्रे वावरतात.मराठी माणसे प्रथम बोटी भरभरून ब्रिटिश दलालांनी मॉरिशिस बेटावर नेली व त्यांना राहण्यासाठी बेटावरील स्थळांची निवड करण्याची संधी दिली तेव्हा मराठी मजुरांनी काळी नदी व तिचा पहाडी प्रदेश पसंत केला..!

यास कारण म्हणजे महाराष्टातून आलेल्या मराठी मंडळीला हा पहाडी विभाग सह्याद्री पर्वताच्या व भीमा,कृष्णा,गोदावरी नदीच्या प्रदेशासारखा थेट वाटला.साधारण १९८५ च्या काळात नदीच्या प्रदेशात त्यावेळचे मराठी समाजाचे नते व दृष्टे कै.लक्ष्मणराव व सौ.भगीरथाबाई पवार यांनी बांधलेले विठोबा रखुमाई यांचे देऊळ गेले १२० वर्ष उभे आहे..!

धर्मा गोविन्द या परिसरातील मराठी माणसांच्या जीवनाशी "जो होय एक सुख दुखपणी गडी ता" असे समरस झालेले आहेत.या बेटावरील कष्टकरी,कामकरी,खेडूत स्त्री - पुरूष,तरुण - तरुणी यांची कहाणी अदभुत व अभिजात मोरस मराठी भाषेत  सजीव साकार केली आहे. "माहेरी गेली" या कथेतील काहीसे गूढ,अदभुत व अमूर्त वातावरण धर्मा गोविन्द थेट नेऊन मानवी सुखदुःखाच्या आंतरिक परंतु अनाकलनीय वास्तवाला विलक्षण प्रत्ययकारिकतेने,कलाकमक्तेने नेऊन भिडवितात..!

हजारो मैलावरच्या हिंदी महासागराच्या पोटातून कधीकाळी प्रचंड भूकंप होवून जलपृष्ठावर आलेल्या मॉरिशिस बेट नावाच्या इवल्याश्या भूखंडावर वावरणारी ही कष्टकरी माणसे एका आपल्या भूत,वर्तमान व भविष्यकालीन भवितव्याशी जशी निगडित आहे तशी एका विशिष्ठ समाज रचनेतही त्यांचे सामाजिक,मानसिक व आत्मिक पोषण झाले आहे.तशातही जातपात टिकून राहते पण तिला छेद मिळत जातो.धर्मा गोविन्द यांनी केलेल्या मोरस मराठी समाजातील लोकगीतांचा वापर त्यांच्या कहाणीला उत्कट,भावनिक परिमाणे प्राप्त करून देतो..!

अशी ही छोटीशी प्रेमकथा मॉरिशिस बेटावर घडते की नक्कीच वाचायला हवी आहे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...