मुख्य सामग्रीवर वगळा

पुस्तक-माहेरी गेली, धर्मा गोविन्द..!

पुस्तक-माहेरी गेली-धर्मा गोविन्द.


काल "धर्मा गोविन्द" लिखित "माहेरी गेली" हे "११६" पानांचे पुस्तक पहाटे दोनच तासात वाचून संपवले अन् एक अनामिक ओढ मॉरिशिसमध्ये वास्तव्य करणाऱ्या मराठी बांधवांची लागली,
हे सर्व का..?

याला उत्तर नव्हते,पुस्तकाबद्दल काय लिहावं हे ही समजत नव्हते.कथा फार काही विशेष अशी नव्हती पण एका आगळ्या वेगळ्या धाटणीची होती,त्यामुळं थोडक्यात काहीतरी माहितीपूर्ण लिहावं हा विचार मनात येऊन गेला..!

परंतु लिहावं तरी काय..?
हा प्रश्न होता मग ठरवूनच प्र.श्री.नेरूरकर यांनी पुस्तकात मोरस मराठी आणि मॉरिशिसमधील मराठी भाषिक लेखन याबद्दल जे काही लिहले आहे ते येथे लिहावेसे वाटले..!

"माहेरी गेली" ही धर्मा गोविन्द यांची कहाणी मॉरिशिस बेटावरील पूर्वेकडील अशा एका घनदाट अरण्यग्रस्त काळ्या नदीच्या परिसरात घडते.की ती स्थलकाळपात्रे या संदर्भात समजून घेण्यासाठी मॉरिशिस  बेटाची,सभोवतालची भौगोलिक रचना सुबुद्ध वाचकाने समजून घेणे आवश्यक आहे..!

तामरिन वे किंवा तामरिन किंवा तामार खेडे गावातील मोर्णे,शामारेल,बे ज्यूकॅम्प या घनदाट व हिंदी महासागराला रुद्रभीषनपणे भिडलेल्या पहाडी भागात धर्मा गोविन्द यांच्या कथेतील मराठी पात्रे वावरतात.मराठी माणसे प्रथम बोटी भरभरून ब्रिटिश दलालांनी मॉरिशिस बेटावर नेली व त्यांना राहण्यासाठी बेटावरील स्थळांची निवड करण्याची संधी दिली तेव्हा मराठी मजुरांनी काळी नदी व तिचा पहाडी प्रदेश पसंत केला..!

यास कारण म्हणजे महाराष्टातून आलेल्या मराठी मंडळीला हा पहाडी विभाग सह्याद्री पर्वताच्या व भीमा,कृष्णा,गोदावरी नदीच्या प्रदेशासारखा थेट वाटला.साधारण १९८५ च्या काळात नदीच्या प्रदेशात त्यावेळचे मराठी समाजाचे नते व दृष्टे कै.लक्ष्मणराव व सौ.भगीरथाबाई पवार यांनी बांधलेले विठोबा रखुमाई यांचे देऊळ गेले १२० वर्ष उभे आहे..!

धर्मा गोविन्द या परिसरातील मराठी माणसांच्या जीवनाशी "जो होय एक सुख दुखपणी गडी ता" असे समरस झालेले आहेत.या बेटावरील कष्टकरी,कामकरी,खेडूत स्त्री - पुरूष,तरुण - तरुणी यांची कहाणी अदभुत व अभिजात मोरस मराठी भाषेत  सजीव साकार केली आहे. "माहेरी गेली" या कथेतील काहीसे गूढ,अदभुत व अमूर्त वातावरण धर्मा गोविन्द थेट नेऊन मानवी सुखदुःखाच्या आंतरिक परंतु अनाकलनीय वास्तवाला विलक्षण प्रत्ययकारिकतेने,कलाकमक्तेने नेऊन भिडवितात..!

हजारो मैलावरच्या हिंदी महासागराच्या पोटातून कधीकाळी प्रचंड भूकंप होवून जलपृष्ठावर आलेल्या मॉरिशिस बेट नावाच्या इवल्याश्या भूखंडावर वावरणारी ही कष्टकरी माणसे एका आपल्या भूत,वर्तमान व भविष्यकालीन भवितव्याशी जशी निगडित आहे तशी एका विशिष्ठ समाज रचनेतही त्यांचे सामाजिक,मानसिक व आत्मिक पोषण झाले आहे.तशातही जातपात टिकून राहते पण तिला छेद मिळत जातो.धर्मा गोविन्द यांनी केलेल्या मोरस मराठी समाजातील लोकगीतांचा वापर त्यांच्या कहाणीला उत्कट,भावनिक परिमाणे प्राप्त करून देतो..!

अशी ही छोटीशी प्रेमकथा मॉरिशिस बेटावर घडते की नक्कीच वाचायला हवी आहे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...