मुख्य सामग्रीवर वगळा

औद्योगिक वसाहतीत भटकत असलेला मी भटक्या..!

औद्योगिक वसाहतीत भटकत असलेला मी भटक्या..!


अलीकडे पहाटेची उन्हं अंगावर यायला लागली आहे काहीच करावेसे वाटत नाही,हातपाय गळून जातात.फक्त मनसोक्त झोपून रहावं,नाहीतर पुस्तकं वाचत निपचित पडून राहावं असं वाटतं.कधी तंद्री लागलीच तर हातात पेन घेऊन किंवा ब्लॉगवर काहीतरी टाईप करत बसावे वाटते,या दिवसातली सकाळ खूप कंटाळवाणी,उदास वाटणारी अन् काहीही करायला नकोसं वाटणारी असते..!

पण काही दिवसांना पर्याय नसतो,मग अंगातला आळस झटकून पुढच्या कामाला लागावेच लागते.इतकं सर्व असूनही माझ्या मनात जेव्हा औद्योगिक वसाहतीत भटकंती करायला जायचं आहे हा विचार मनात आला की मी लगेच तयार होवून औद्योगिक वसाहतीच्या भरदुपारी काहिलीच्या ऊन्हात,सूनसान वाटणाऱ्या वाटांना भटकंती करायला निघून जातो..!

मला या वाटांशी का इतका लगाव आहे किंवा का मला इतकी जवळीक त्यांच्याबद्दल वाटते हे मला आजवर कळले नाहीये.काहीही साध्य करायचं नसतांना फक्त भटकंती करायची म्हणून कित्येक दिवस मी या अवाढव्य शहराच्या सभोवताली असलेल्या औद्योगिक वसाहतीत पायीपायी भटकंती करत आडमार्गे भटकत राहिलो आहे..!

उन्हाळ्याच्या या दिवसात असच वाळलेल्या,भुरक्या पांढऱ्याफट्ट पडलेल्या रानात हिंडायला मला खूप आवडतं,अश्यावेळी डोक्यातून घरंगळत येणाऱ्या घामांचे ओघळ घामेजलेल्या हातांनी टिपायला खूप आवडते.दीड किलो असलेल्या सेफ्टी बुटात घातलेल्या सोक्सच्या आत घामाने होणाऱ्या चिखलाला अनुभवायला आवडते..!

इकडं भटकायला आलं की आपली दुःखे आपली न राहता ती इतरांची होतात अन् इतरांची दुःख आपली होतात.इथे त्रासलेल्या माणसांच्या नजरा आपल्याला खुणावू लागतात अन् आपल्यातला माणूस जागा होतो.इतरांची दुःखे आपली वाटायला लागतात अन् आपण विचाराने अधिकच परिपक्व होत जातो,त्यामुळे  महिना-पंधरा दिवस झाले की मी असं भटकून येतो पाच-सहा तास..!

औद्योगिक वसाहतीत बावीस-पंचवीस वर्षांची माझ्या वयातली भंगार वेचनारी मुलं मला दिसली की मी दिवसभर त्यांच्यामागे भटकत असतो.त्यांचं जीवन,त्यांच्या जगण्यातले अवघडलेपण अनुभवत असतो.दिवसभर भंगार,जुनाट,बंद पडलेल्या कंपन्यांच्या आवारात ही पोरं जवळपास भटकत असतात.पायात असलेली सिल्पर चप्पल,विस्कटलेले केसं,उन्हातान्हात भटकून-भटकून पार काळीठीक्कूर पडलेली असतात.त्यांच्याकडे बघून अस्वस्थ व्हायला होतं,ऐन उमेदीच्या वयात आपण काय करतो आहे असा प्रश्न त्यांना बघून मला पडतो..!

उन्हातान्हात भटकत रहायचं जुन्या बंद पडलेल्या कंपन्या बघत,त्यांना बघितलं,त्यांच्या मोडकळीस आलेल्या ईमारती बघितल्या की आपसूकच त्यांचा भविष्यकाळ अन् त्या काळाच्या पुसट झालेल्या खुणा त्या भिंतीवरील ओघळांवरून दिसून येतात..!
कुठे क्षणभराचा गारवा अनुभवयाला येतो पण या गारव्यात पुढे कंपनी बंद पडून बरबाद झालेली ती पिढी तिचा वाईट काळ आठवतो अन् जशी औद्योगिक वसाहतीत यंत्रांची घडघड ऐकायला येते तशी हृदयाची स्पंदने मग स्पष्टच या गारव्यात ऐकायला येतात अन् पुन्हा एक ओघळ घरंगळत मानेवरून बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात मातीमोल मातीचा होतो जशी ती पिढी अवघे आयुष्य सोसत मातीमोल मातीची होत गेलेली असते..!

बराचवेळ भटकून झालं की एखाद्या चालू असलेल्या विदेशी कंपनीच्या गेटवर येऊन तिच्या गेटजवळ बांधलेल्या कठड्यावर येऊन बसतो,जिथं दर दोन-तीन घंटे झाले की पाण्याचा फवारा आणून नळीने सडा मारला जातो.मग तिथं जरावेळ बसून गारवा अनुभवत रहायचं पण इथेही आमच्या नशिबी बसणं लिहलेले नसते,सेक्युरिटी गार्ड बाबा धावतच येतो हकलवून लावतो मग उसने हसू घेऊन तिथून काढता पाय घेतला की निघायचं डांबरी सूंनसांन रस्त्याला..!
 
एखादी नाश्ता करायची खानावळ दिसली की मळकटलेल्या चड्डीच्या खिशातून दहाची चिल्लर काढायची अन् वडापाव घेऊन खात बसायचं बाकड्यावर.तिथं बसणंही आमच्या नशिबी कुठं,लोकं हकलवून लावतात साले..!

दुनियादारी शिकवते ही औद्योगिक वसाहत त्यामुळे असं भटकून घेतो कधी कधी..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड