मुख्य सामग्रीवर वगळा

औद्योगिक वसाहतीत भटकत असलेला मी भटक्या..!

औद्योगिक वसाहतीत भटकत असलेला मी भटक्या..!


अलीकडे पहाटेची उन्हं अंगावर यायला लागली आहे काहीच करावेसे वाटत नाही,हातपाय गळून जातात.फक्त मनसोक्त झोपून रहावं,नाहीतर पुस्तकं वाचत निपचित पडून राहावं असं वाटतं.कधी तंद्री लागलीच तर हातात पेन घेऊन किंवा ब्लॉगवर काहीतरी टाईप करत बसावे वाटते,या दिवसातली सकाळ खूप कंटाळवाणी,उदास वाटणारी अन् काहीही करायला नकोसं वाटणारी असते..!

पण काही दिवसांना पर्याय नसतो,मग अंगातला आळस झटकून पुढच्या कामाला लागावेच लागते.इतकं सर्व असूनही माझ्या मनात जेव्हा औद्योगिक वसाहतीत भटकंती करायला जायचं आहे हा विचार मनात आला की मी लगेच तयार होवून औद्योगिक वसाहतीच्या भरदुपारी काहिलीच्या ऊन्हात,सूनसान वाटणाऱ्या वाटांना भटकंती करायला निघून जातो..!

मला या वाटांशी का इतका लगाव आहे किंवा का मला इतकी जवळीक त्यांच्याबद्दल वाटते हे मला आजवर कळले नाहीये.काहीही साध्य करायचं नसतांना फक्त भटकंती करायची म्हणून कित्येक दिवस मी या अवाढव्य शहराच्या सभोवताली असलेल्या औद्योगिक वसाहतीत पायीपायी भटकंती करत आडमार्गे भटकत राहिलो आहे..!

उन्हाळ्याच्या या दिवसात असच वाळलेल्या,भुरक्या पांढऱ्याफट्ट पडलेल्या रानात हिंडायला मला खूप आवडतं,अश्यावेळी डोक्यातून घरंगळत येणाऱ्या घामांचे ओघळ घामेजलेल्या हातांनी टिपायला खूप आवडते.दीड किलो असलेल्या सेफ्टी बुटात घातलेल्या सोक्सच्या आत घामाने होणाऱ्या चिखलाला अनुभवायला आवडते..!

इकडं भटकायला आलं की आपली दुःखे आपली न राहता ती इतरांची होतात अन् इतरांची दुःख आपली होतात.इथे त्रासलेल्या माणसांच्या नजरा आपल्याला खुणावू लागतात अन् आपल्यातला माणूस जागा होतो.इतरांची दुःखे आपली वाटायला लागतात अन् आपण विचाराने अधिकच परिपक्व होत जातो,त्यामुळे  महिना-पंधरा दिवस झाले की मी असं भटकून येतो पाच-सहा तास..!

औद्योगिक वसाहतीत बावीस-पंचवीस वर्षांची माझ्या वयातली भंगार वेचनारी मुलं मला दिसली की मी दिवसभर त्यांच्यामागे भटकत असतो.त्यांचं जीवन,त्यांच्या जगण्यातले अवघडलेपण अनुभवत असतो.दिवसभर भंगार,जुनाट,बंद पडलेल्या कंपन्यांच्या आवारात ही पोरं जवळपास भटकत असतात.पायात असलेली सिल्पर चप्पल,विस्कटलेले केसं,उन्हातान्हात भटकून-भटकून पार काळीठीक्कूर पडलेली असतात.त्यांच्याकडे बघून अस्वस्थ व्हायला होतं,ऐन उमेदीच्या वयात आपण काय करतो आहे असा प्रश्न त्यांना बघून मला पडतो..!

उन्हातान्हात भटकत रहायचं जुन्या बंद पडलेल्या कंपन्या बघत,त्यांना बघितलं,त्यांच्या मोडकळीस आलेल्या ईमारती बघितल्या की आपसूकच त्यांचा भविष्यकाळ अन् त्या काळाच्या पुसट झालेल्या खुणा त्या भिंतीवरील ओघळांवरून दिसून येतात..!
कुठे क्षणभराचा गारवा अनुभवयाला येतो पण या गारव्यात पुढे कंपनी बंद पडून बरबाद झालेली ती पिढी तिचा वाईट काळ आठवतो अन् जशी औद्योगिक वसाहतीत यंत्रांची घडघड ऐकायला येते तशी हृदयाची स्पंदने मग स्पष्टच या गारव्यात ऐकायला येतात अन् पुन्हा एक ओघळ घरंगळत मानेवरून बंद पडलेल्या कंपनीच्या आवारात मातीमोल मातीचा होतो जशी ती पिढी अवघे आयुष्य सोसत मातीमोल मातीची होत गेलेली असते..!

बराचवेळ भटकून झालं की एखाद्या चालू असलेल्या विदेशी कंपनीच्या गेटवर येऊन तिच्या गेटजवळ बांधलेल्या कठड्यावर येऊन बसतो,जिथं दर दोन-तीन घंटे झाले की पाण्याचा फवारा आणून नळीने सडा मारला जातो.मग तिथं जरावेळ बसून गारवा अनुभवत रहायचं पण इथेही आमच्या नशिबी बसणं लिहलेले नसते,सेक्युरिटी गार्ड बाबा धावतच येतो हकलवून लावतो मग उसने हसू घेऊन तिथून काढता पाय घेतला की निघायचं डांबरी सूंनसांन रस्त्याला..!
 
एखादी नाश्ता करायची खानावळ दिसली की मळकटलेल्या चड्डीच्या खिशातून दहाची चिल्लर काढायची अन् वडापाव घेऊन खात बसायचं बाकड्यावर.तिथं बसणंही आमच्या नशिबी कुठं,लोकं हकलवून लावतात साले..!

दुनियादारी शिकवते ही औद्योगिक वसाहत त्यामुळे असं भटकून घेतो कधी कधी..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...