मुख्य सामग्रीवर वगळा

पहाटेच्या उदासवाण्या वेळेचे गणित..!

पहाटेच्या उदासवाण्या वेळेचे गणित..!


सकाळच्या उदासवाण्या वेळेत पहाटेच उठून आवरून सावरून बसलं की   जसजसा उन्हाचा पारा चढत जातो तसतसे शरीरात मरगळ येत जाते,दिवस नकोसा वाटतो,झोप हवीहवीशी वाटते मग पुन्हा कितीक वेळ निपचित त्राण गेल्यासारखे कॉटवर पडून असतो..!

उन्हं अंगावर यायला लागले की पुन्हा जाग येते,संथपणे वाहणारा कोरडा शुष्क वारा नकोसा वाटतो.मी खूप जीवावर करून एखादं अधुरं वाचनाचं पुस्तक हातात घेतलं,तसं आता हातच्याला असलेली सर्वच पुस्तके वाचून संपवली आहे नवीन घेतले किंवा भेटले तर ते वाचूनच मी पूर्ण थांबतो म्हणून वाचन करावं किंवा वाटावं असं सध्यातरी घरात काही नाही,मग जे मिळेल ते वाचत बसतो..!

जशी राक्षसाला खाण्याची भूक असते तशी मला अलीकडे अर्थपूर्ण वाचनाची भूक लागली आहे,जी दिवसेंदिवस वाढत आहे.सध्या आयुष्यात बराच निवांतपणा आहे त्यामुळं असावं कदाचित.पुढे चालून व्यस्थतेच्या काळात सुद्धा ही भूक अशीच वाढत राहील असे वाटते आहे,शरीराला मनाला ती सवय लावून घ्यायची आहे..!

माझी ईच्छा इतकीच आहे आपण इतकी पुस्तके वाचावी,घरात संग्रही करावी की घरात आपल्या वाचनाने समाजातील माहित नाही पण आपल्या घरातील पुढच्या पिढ्या तरी आपली ही सवय आपल्याला बघून त्यांच्या अंगवळणी पाडून घेतील..!

त्यावेळी आपल्याला जी पुस्तकासाठी,पुस्तक मिळविण्यासाठी जे सोसायला लागलं,ते त्यांच्या वाट्याला नको यायला म्हणून सोबतीने त्यांच्यासाठी खूप मोठा संग्रह घरात पुस्तकांचा असावा ही माझी इच्छा आहे.कारण समाज व्यवस्थेकडून पुढची पिढी संस्कारशील घडणं मलातरी अशक्य वाटते कारणे मी सांगायला नको आहे,त्यामुळं पुस्तकवाचन हेच एक माध्यम सध्यातरी मला जवळचे वाटते..!

मी पुस्तक वाचत असतो,खिडकीतून अनेक आवाज ऐकू येत असतात कुणी भंगारवाला,भाजीपाला विकणारी बाई,केसांवर भांडे देऊ करणारे मुलं,महामार्गावर असलेल्या वर्दळीचा आवाज,गॅलरीत चिमण्यांचा दाने टिपत असताना येणारा आवाज असं सर्व काही ऐकू येत असतं अन् मी आपलं वाचन करत असतांना एकावेळी दोन विश्व अनुभवत असतो एक प्रत्यक्षातले अन् एक पुस्तकातले..!

काल शिवनामायला भेट देऊन आलो,संथ वाहणारी शिवनामाय बऱ्याचवेळ डोळ्यात भरवून घेतली मनात विचार येऊन गेला तिच्या किनाऱ्यावर बसायला एखादा बँच भेटला असता तर कित्येक पुस्तकांचा शेवट तिच्या सानिध्यात करता आला असता.तिथं नसतो कुठला आवाज किंवा कुणी हाक देणारं फक्त तिचं संथपणे वाहनं,या कडाक्याच्या दिवसात अनुभवायला येणारा गारवा,चहूकडे असलेली झाडांची हिरवळ अन् निसर्ग सौंदर्य खरच नदीचं सौंदर्य तिच्या आसपासचा परिसर वेड लावतो..!

जर आयुष्यात सर्व ठरल्याप्रमाणे झालं तर आयुष्याचा शेवटचा काही काळ नदीच्या तीरावर एकट्यासाठी एक छान टुमदार घर बांधून तिथं खूप काही वाचन करून दोन-तीन पुस्तकं लिहण्याची इच्छा आहे.जे माझ्यानंतर माझी ओळख बनावी,सध्यातरी आयुष्यात जरतरला महत्त्व नाहीये पण हे होईल हे नक्की..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...