मुख्य सामग्रीवर वगळा

पहाटेच्या उदासवाण्या वेळेचे गणित..!

पहाटेच्या उदासवाण्या वेळेचे गणित..!


सकाळच्या उदासवाण्या वेळेत पहाटेच उठून आवरून सावरून बसलं की   जसजसा उन्हाचा पारा चढत जातो तसतसे शरीरात मरगळ येत जाते,दिवस नकोसा वाटतो,झोप हवीहवीशी वाटते मग पुन्हा कितीक वेळ निपचित त्राण गेल्यासारखे कॉटवर पडून असतो..!

उन्हं अंगावर यायला लागले की पुन्हा जाग येते,संथपणे वाहणारा कोरडा शुष्क वारा नकोसा वाटतो.मी खूप जीवावर करून एखादं अधुरं वाचनाचं पुस्तक हातात घेतलं,तसं आता हातच्याला असलेली सर्वच पुस्तके वाचून संपवली आहे नवीन घेतले किंवा भेटले तर ते वाचूनच मी पूर्ण थांबतो म्हणून वाचन करावं किंवा वाटावं असं सध्यातरी घरात काही नाही,मग जे मिळेल ते वाचत बसतो..!

जशी राक्षसाला खाण्याची भूक असते तशी मला अलीकडे अर्थपूर्ण वाचनाची भूक लागली आहे,जी दिवसेंदिवस वाढत आहे.सध्या आयुष्यात बराच निवांतपणा आहे त्यामुळं असावं कदाचित.पुढे चालून व्यस्थतेच्या काळात सुद्धा ही भूक अशीच वाढत राहील असे वाटते आहे,शरीराला मनाला ती सवय लावून घ्यायची आहे..!

माझी ईच्छा इतकीच आहे आपण इतकी पुस्तके वाचावी,घरात संग्रही करावी की घरात आपल्या वाचनाने समाजातील माहित नाही पण आपल्या घरातील पुढच्या पिढ्या तरी आपली ही सवय आपल्याला बघून त्यांच्या अंगवळणी पाडून घेतील..!

त्यावेळी आपल्याला जी पुस्तकासाठी,पुस्तक मिळविण्यासाठी जे सोसायला लागलं,ते त्यांच्या वाट्याला नको यायला म्हणून सोबतीने त्यांच्यासाठी खूप मोठा संग्रह घरात पुस्तकांचा असावा ही माझी इच्छा आहे.कारण समाज व्यवस्थेकडून पुढची पिढी संस्कारशील घडणं मलातरी अशक्य वाटते कारणे मी सांगायला नको आहे,त्यामुळं पुस्तकवाचन हेच एक माध्यम सध्यातरी मला जवळचे वाटते..!

मी पुस्तक वाचत असतो,खिडकीतून अनेक आवाज ऐकू येत असतात कुणी भंगारवाला,भाजीपाला विकणारी बाई,केसांवर भांडे देऊ करणारे मुलं,महामार्गावर असलेल्या वर्दळीचा आवाज,गॅलरीत चिमण्यांचा दाने टिपत असताना येणारा आवाज असं सर्व काही ऐकू येत असतं अन् मी आपलं वाचन करत असतांना एकावेळी दोन विश्व अनुभवत असतो एक प्रत्यक्षातले अन् एक पुस्तकातले..!

काल शिवनामायला भेट देऊन आलो,संथ वाहणारी शिवनामाय बऱ्याचवेळ डोळ्यात भरवून घेतली मनात विचार येऊन गेला तिच्या किनाऱ्यावर बसायला एखादा बँच भेटला असता तर कित्येक पुस्तकांचा शेवट तिच्या सानिध्यात करता आला असता.तिथं नसतो कुठला आवाज किंवा कुणी हाक देणारं फक्त तिचं संथपणे वाहनं,या कडाक्याच्या दिवसात अनुभवायला येणारा गारवा,चहूकडे असलेली झाडांची हिरवळ अन् निसर्ग सौंदर्य खरच नदीचं सौंदर्य तिच्या आसपासचा परिसर वेड लावतो..!

जर आयुष्यात सर्व ठरल्याप्रमाणे झालं तर आयुष्याचा शेवटचा काही काळ नदीच्या तीरावर एकट्यासाठी एक छान टुमदार घर बांधून तिथं खूप काही वाचन करून दोन-तीन पुस्तकं लिहण्याची इच्छा आहे.जे माझ्यानंतर माझी ओळख बनावी,सध्यातरी आयुष्यात जरतरला महत्त्व नाहीये पण हे होईल हे नक्की..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...