मुख्य सामग्रीवर वगळा

वास्तव्य समुद्र किनारचे..!

वास्तव्य समुद्र किनारचे..!


भर सकाळची वेळ कोवळी उन्हं अंगावर येतात,घराच्या सभोवताली असलेल्या पाडांच्या झाडावर गळतीस आलेल्या,वाळलेल्या झावळ्यांचा आवाज झोपल्या ठिकाणी येतो.वाऱ्याचा सुरसुर करणारा आवाज अन त्याच्या लगोलग असलेला समुद्रकिनारी घर असल्यानं पहाटे-पहाटे समुद्राच्या गाजेचा येणारा आवाज झोपेत हे सर्वच संगीत ऐकत मी निपचित पडलेलो असतो..!

समुद्र किनाऱ्याशी समीप असलेल्या,झोपडीवजा घरं असलेल्या घरातील किंवा ऐसपेस बंगले असलेल्या घरांची पहाट काही हळुवारच होत असते.त्यांच्या आयुष्यात एक हळुवारपण आलेलं असतं,समुद्राला घेऊन एक आपलेपण असतं,रोजचं भटकणं असो किंवा आयुष्याला घेऊन आयुष्याचे स्वगत करताना आपसूकच समुद्र अन त्याच्या सानिध्यात घातलेली सकाळ असो किंवा सायंकाळ हवीहवीशी वाटणारी असते..!

मला नेहमीच समुद्र किनारी असलेल्या सभोवतालच्या परिसरात काळोख अधिकच गडद असल्याची अनामिक जाणीव होत असते,जी सभोवताली असलेल्या महादेवाच्या देऊळात अजूनच प्रकर्षाने जाणवते.एक प्रकारचं दमट वातावरण,देऊळाच्या सभोवताली वाहणारा गोड्या पाण्याचा झरा असं काही मनात समुद्र किनारा आला की त्याच्या लागून माझ्या मनात येणारं हे चित्र आहे..!

समुद्र किनारी वास्तव्याला गेलं की,एक हळुवारपण आयुष्यात येतं.सायंकाळी आपसुकच पावले किनाऱ्यावर कित्येकवेळ घुटमळत राहतात,समुद्राला जाणून घ्यायला,तेथील नावाड्यांचा सायंकाळचा प्रवास,जाळ्यांची विन सुटत असतांना बघितले की मला अस्वस्थ व्हायला होतं.होडीला तिला तिच्या रंगसंगतीने सजविलेले असते ते बघायला आवडते,तिला बघत असतांना समुद्राची गाज माझ्या अंगावर येते ती नकोशी वाटते पण अथांग समुद्र हवाहवासा वाटतो,डोळ्यांना जिथवर दिसेल तिथवर तो नजरेत भरून घ्यायला आवडतो,त्याच्या सानिध्यात अस्ताला जाणारा मावळता सूर्य बघायला आवडतो..!

पुन्हा झोपडीवजा असलेल्या घरातून घासलेटाच्या इंधनावर चालणाऱ्या अन् मिनमिन करणाऱ्या चिमणीच्या उजेडात मोडकळीस आलेल्या खिडकीतून तो अंधारलेला समुद्र अन् त्याची गाझ ऐकायला भारी वाटतं.त्याच्यासोबत ताटलीत साखरभात घेऊन खिडकीत बसून खायला आवडतं..!

खिडकीत बसून समुद्राचा विचार करत असलो की काळोख अधिकच गडद होत जातो अन् मला मग समुद्राच्या सभोवताली घडलेल्या असंख्य कथा,वाचलेली पुस्तके अन् त्यातील प्रसंग आठवायला लागतात.मला एक प्रश्न नेहमीच पडत असतो,येथील माणसं आपल्या स्वतःच्या आयुष्यात इतकी कशी रममाण असतात,कामाखेरीच फार वेळ ही माणसं आपलं स्वतःचं आयुष्य अन् माडाच्या झावळ्यांच्या सहवासात घालवत असतात.माड त्यांना खूप काही देतो पण माड त्यांचं आयुष्य होवू शकत नाहीयेना,तरीही या माणसांची पहाट ही त्याच्या सानिध्यातच होते..!

बाकी कौलारू घरं,माडाची उंच उंच झाडं,घराच्या सभोवताली दाटून आलेला काळोख,समुद्राची गाज,होड्यांचा समुद्रातून परतीच्या वाटेवर येतांना येणारा आवाज,रापणीच्या वेळी जाळे टाकतांनी होणारी फजिती,अंगावर येणारा वारा,जाळ्यात तडफडणारी मासे,विविध रंगसंगतीचे झोपडीवजा घरे,होड्या,होड्यांचा चालू होताना इंजिनाचा होणारा आवाज अन् समुद्राला न्याहाळत रममाण झालेलो मी..!

Written by,
Bharat Sonwane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...