मुख्य सामग्रीवर वगळा

वास्तव्य समुद्र किनारचे..!

वास्तव्य समुद्र किनारचे..!


भर सकाळची वेळ कोवळी उन्हं अंगावर येतात,घराच्या सभोवताली असलेल्या पाडांच्या झाडावर गळतीस आलेल्या,वाळलेल्या झावळ्यांचा आवाज झोपल्या ठिकाणी येतो.वाऱ्याचा सुरसुर करणारा आवाज अन त्याच्या लगोलग असलेला समुद्रकिनारी घर असल्यानं पहाटे-पहाटे समुद्राच्या गाजेचा येणारा आवाज झोपेत हे सर्वच संगीत ऐकत मी निपचित पडलेलो असतो..!

समुद्र किनाऱ्याशी समीप असलेल्या,झोपडीवजा घरं असलेल्या घरातील किंवा ऐसपेस बंगले असलेल्या घरांची पहाट काही हळुवारच होत असते.त्यांच्या आयुष्यात एक हळुवारपण आलेलं असतं,समुद्राला घेऊन एक आपलेपण असतं,रोजचं भटकणं असो किंवा आयुष्याला घेऊन आयुष्याचे स्वगत करताना आपसूकच समुद्र अन त्याच्या सानिध्यात घातलेली सकाळ असो किंवा सायंकाळ हवीहवीशी वाटणारी असते..!

मला नेहमीच समुद्र किनारी असलेल्या सभोवतालच्या परिसरात काळोख अधिकच गडद असल्याची अनामिक जाणीव होत असते,जी सभोवताली असलेल्या महादेवाच्या देऊळात अजूनच प्रकर्षाने जाणवते.एक प्रकारचं दमट वातावरण,देऊळाच्या सभोवताली वाहणारा गोड्या पाण्याचा झरा असं काही मनात समुद्र किनारा आला की त्याच्या लागून माझ्या मनात येणारं हे चित्र आहे..!

समुद्र किनारी वास्तव्याला गेलं की,एक हळुवारपण आयुष्यात येतं.सायंकाळी आपसुकच पावले किनाऱ्यावर कित्येकवेळ घुटमळत राहतात,समुद्राला जाणून घ्यायला,तेथील नावाड्यांचा सायंकाळचा प्रवास,जाळ्यांची विन सुटत असतांना बघितले की मला अस्वस्थ व्हायला होतं.होडीला तिला तिच्या रंगसंगतीने सजविलेले असते ते बघायला आवडते,तिला बघत असतांना समुद्राची गाज माझ्या अंगावर येते ती नकोशी वाटते पण अथांग समुद्र हवाहवासा वाटतो,डोळ्यांना जिथवर दिसेल तिथवर तो नजरेत भरून घ्यायला आवडतो,त्याच्या सानिध्यात अस्ताला जाणारा मावळता सूर्य बघायला आवडतो..!

पुन्हा झोपडीवजा असलेल्या घरातून घासलेटाच्या इंधनावर चालणाऱ्या अन् मिनमिन करणाऱ्या चिमणीच्या उजेडात मोडकळीस आलेल्या खिडकीतून तो अंधारलेला समुद्र अन् त्याची गाझ ऐकायला भारी वाटतं.त्याच्यासोबत ताटलीत साखरभात घेऊन खिडकीत बसून खायला आवडतं..!

खिडकीत बसून समुद्राचा विचार करत असलो की काळोख अधिकच गडद होत जातो अन् मला मग समुद्राच्या सभोवताली घडलेल्या असंख्य कथा,वाचलेली पुस्तके अन् त्यातील प्रसंग आठवायला लागतात.मला एक प्रश्न नेहमीच पडत असतो,येथील माणसं आपल्या स्वतःच्या आयुष्यात इतकी कशी रममाण असतात,कामाखेरीच फार वेळ ही माणसं आपलं स्वतःचं आयुष्य अन् माडाच्या झावळ्यांच्या सहवासात घालवत असतात.माड त्यांना खूप काही देतो पण माड त्यांचं आयुष्य होवू शकत नाहीयेना,तरीही या माणसांची पहाट ही त्याच्या सानिध्यातच होते..!

बाकी कौलारू घरं,माडाची उंच उंच झाडं,घराच्या सभोवताली दाटून आलेला काळोख,समुद्राची गाज,होड्यांचा समुद्रातून परतीच्या वाटेवर येतांना येणारा आवाज,रापणीच्या वेळी जाळे टाकतांनी होणारी फजिती,अंगावर येणारा वारा,जाळ्यात तडफडणारी मासे,विविध रंगसंगतीचे झोपडीवजा घरे,होड्या,होड्यांचा चालू होताना इंजिनाचा होणारा आवाज अन् समुद्राला न्याहाळत रममाण झालेलो मी..!

Written by,
Bharat Sonwane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...