मुख्य सामग्रीवर वगळा

Book-Letter's From Jail" - "M.N.Roy".

Book- Letter's From Jail" - "M.N.Roy".


"Letter's From Jail" - "M.N.Roy".
अनुवादित पुस्तक "तुरुंगातील पत्रे" - "द्बा.भ कर्णिक".
परवा सकाळी वाचायला घेतलेलं - "द्बा.भ कर्णिक" लिखित पुस्तक "तुरुंगातील पत्रे" हे  १८१ पानी पुस्तक काल दुपारी अखेरीस वेळ मिळेल तेव्हा वाचून संपवले..!

पुस्तक खूप रेअर असं आहे.पुस्तक अन् पुस्तकातील नायकाचा प्रवास हा खूप अनोखा अन् वेगळा आहे.म्हणजे आपण जर जेलमध्ये असताना पाठवलेले पत्र कसे असेल ही कल्पना करून जर पुस्तक वाचणार असाल तर तुमची निराशा होईल..!

कारण लेखकांनी या पुस्तकात अनेक विषयांना हात घातलेला आहे,त्यामुळे वरवर हे खूप सहज समजेल असे पुस्तक नाही.यात एकतर तुम्हाला स्वतंत्रपूर्व भारताचा अन् त्या काळातील जगाचा इतिहास जाणून घेण्याची किंवा काही प्रमाणात तो माहिती असायला हवा आहे.तेव्हाच हे पुस्तक तुम्हाला जवळचे वाटेल नाहीतर आपण फक्त जेलमधील नायकाचे वास्तव्य,त्याला येणाऱ्या अडचणी इतकंच या पुस्तकातून समजू शकू..!

पुस्तक अन् पुस्तकातील नायकाचा म्हणजे त्या पुस्तकातील जेलमध्ये कारावासाची शिक्षा भोगणर्या कैद्याचा हा सहा वर्षांचा प्रवास पत्रांच्या माध्यमातून खूप हळुवार लेखकाने पुस्तकात उलगडलेला आहे.नायकाला झालेली बारा वर्षांची शिक्षा पुढे ती कमी होवून सहा वर्षांची होते अन् त्याने या सहा वर्षात त्याच्या पत्नीशी केलेल्या पत्रव्यवहारास लेखकाने पुस्तकात उतरवले आहे..!

स्वतंत्रपूर्व काळात आपल्या देशासाठी अनेक क्रांतिकारकांनी सश्रम कारावास भोगला,यातीलच एक हे क्रांतिकारक असावे असे मला वाटते.कारण त्यांनी शेवटच्या पत्रापर्यंत कुठेही त्यांचा किंवा त्यांच्या पत्नीच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केलेला पत्रात दिसुन येत नाही..!

सर्व पत्र नायकाने आपल्या पत्नीसाठी,प्रिय मित्रांसाठी,आप्तस्वकियांसाठी पत्नीच्या माध्यमातून लिहलेले आहेत. तुरुंगात कारावासाची शिक्षा भोगत असताना नायकानी अनेक पुस्तके,कादंबऱ्या,मासिके वाचली.जे देश विदेशातून त्याच्या पत्नीने,त्यांच्या मित्राने त्याला पाठवली आहे..!

कारावासात असताना त्याची झालेली तेथील अवस्था,राहणीमान,सभोवतालचे वातावरण,निसर्ग,त्याची खालवणारी तब्येत,पत्नीने,मित्रांनी वेळोवेळी पुस्तके पाठवूनही ते त्याला मिळत नसतात त्यामुळे त्याची होणारी गैरसोय हे सर्व काही लेखकाने या पत्रांच्या माध्यमातून लिहलेले आहे..!

त्याचा हा सर्व प्रवास अन या सर्वांच्या पलीकडे जगाशी असलेला त्याचा संबंध,सोबतच त्याने या सहा वर्षांच्या काळात जेलमध्ये केलेलं असंख्य लेखन वेळोवेळी त्याची अनेक जेलमध्ये होणारी बदली त्याने जेलमध्ये पाळलेली मांजर,जेल समोर लावलेली असंख्य फुलांची छोटीशी बाग अन् त्याचं तिला न्याहाळत रहाणं,त्याला एकट्याचा सहवास खूप आवडतो त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या कैद्यांसाठी त्याची होणारी चिडचिड अन् जेलमधून सुटल्यावर आपल्या भविष्यातील योजना हे सर्व लेखक या हळूवार प्रवासातून आपल्याला उलगडून सांगत असतात..!

तेव्हा नक्कीच वाचावं असं हे पुस्तक..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...