मुख्य सामग्रीवर वगळा

Book-Letter's From Jail" - "M.N.Roy".

Book- Letter's From Jail" - "M.N.Roy".


"Letter's From Jail" - "M.N.Roy".
अनुवादित पुस्तक "तुरुंगातील पत्रे" - "द्बा.भ कर्णिक".
परवा सकाळी वाचायला घेतलेलं - "द्बा.भ कर्णिक" लिखित पुस्तक "तुरुंगातील पत्रे" हे  १८१ पानी पुस्तक काल दुपारी अखेरीस वेळ मिळेल तेव्हा वाचून संपवले..!

पुस्तक खूप रेअर असं आहे.पुस्तक अन् पुस्तकातील नायकाचा प्रवास हा खूप अनोखा अन् वेगळा आहे.म्हणजे आपण जर जेलमध्ये असताना पाठवलेले पत्र कसे असेल ही कल्पना करून जर पुस्तक वाचणार असाल तर तुमची निराशा होईल..!

कारण लेखकांनी या पुस्तकात अनेक विषयांना हात घातलेला आहे,त्यामुळे वरवर हे खूप सहज समजेल असे पुस्तक नाही.यात एकतर तुम्हाला स्वतंत्रपूर्व भारताचा अन् त्या काळातील जगाचा इतिहास जाणून घेण्याची किंवा काही प्रमाणात तो माहिती असायला हवा आहे.तेव्हाच हे पुस्तक तुम्हाला जवळचे वाटेल नाहीतर आपण फक्त जेलमधील नायकाचे वास्तव्य,त्याला येणाऱ्या अडचणी इतकंच या पुस्तकातून समजू शकू..!

पुस्तक अन् पुस्तकातील नायकाचा म्हणजे त्या पुस्तकातील जेलमध्ये कारावासाची शिक्षा भोगणर्या कैद्याचा हा सहा वर्षांचा प्रवास पत्रांच्या माध्यमातून खूप हळुवार लेखकाने पुस्तकात उलगडलेला आहे.नायकाला झालेली बारा वर्षांची शिक्षा पुढे ती कमी होवून सहा वर्षांची होते अन् त्याने या सहा वर्षात त्याच्या पत्नीशी केलेल्या पत्रव्यवहारास लेखकाने पुस्तकात उतरवले आहे..!

स्वतंत्रपूर्व काळात आपल्या देशासाठी अनेक क्रांतिकारकांनी सश्रम कारावास भोगला,यातीलच एक हे क्रांतिकारक असावे असे मला वाटते.कारण त्यांनी शेवटच्या पत्रापर्यंत कुठेही त्यांचा किंवा त्यांच्या पत्नीच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केलेला पत्रात दिसुन येत नाही..!

सर्व पत्र नायकाने आपल्या पत्नीसाठी,प्रिय मित्रांसाठी,आप्तस्वकियांसाठी पत्नीच्या माध्यमातून लिहलेले आहेत. तुरुंगात कारावासाची शिक्षा भोगत असताना नायकानी अनेक पुस्तके,कादंबऱ्या,मासिके वाचली.जे देश विदेशातून त्याच्या पत्नीने,त्यांच्या मित्राने त्याला पाठवली आहे..!

कारावासात असताना त्याची झालेली तेथील अवस्था,राहणीमान,सभोवतालचे वातावरण,निसर्ग,त्याची खालवणारी तब्येत,पत्नीने,मित्रांनी वेळोवेळी पुस्तके पाठवूनही ते त्याला मिळत नसतात त्यामुळे त्याची होणारी गैरसोय हे सर्व काही लेखकाने या पत्रांच्या माध्यमातून लिहलेले आहे..!

त्याचा हा सर्व प्रवास अन या सर्वांच्या पलीकडे जगाशी असलेला त्याचा संबंध,सोबतच त्याने या सहा वर्षांच्या काळात जेलमध्ये केलेलं असंख्य लेखन वेळोवेळी त्याची अनेक जेलमध्ये होणारी बदली त्याने जेलमध्ये पाळलेली मांजर,जेल समोर लावलेली असंख्य फुलांची छोटीशी बाग अन् त्याचं तिला न्याहाळत रहाणं,त्याला एकट्याचा सहवास खूप आवडतो त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या कैद्यांसाठी त्याची होणारी चिडचिड अन् जेलमधून सुटल्यावर आपल्या भविष्यातील योजना हे सर्व लेखक या हळूवार प्रवासातून आपल्याला उलगडून सांगत असतात..!

तेव्हा नक्कीच वाचावं असं हे पुस्तक..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...