मुख्य सामग्रीवर वगळा

Book-Letter's From Jail" - "M.N.Roy".

Book- Letter's From Jail" - "M.N.Roy".


"Letter's From Jail" - "M.N.Roy".
अनुवादित पुस्तक "तुरुंगातील पत्रे" - "द्बा.भ कर्णिक".
परवा सकाळी वाचायला घेतलेलं - "द्बा.भ कर्णिक" लिखित पुस्तक "तुरुंगातील पत्रे" हे  १८१ पानी पुस्तक काल दुपारी अखेरीस वेळ मिळेल तेव्हा वाचून संपवले..!

पुस्तक खूप रेअर असं आहे.पुस्तक अन् पुस्तकातील नायकाचा प्रवास हा खूप अनोखा अन् वेगळा आहे.म्हणजे आपण जर जेलमध्ये असताना पाठवलेले पत्र कसे असेल ही कल्पना करून जर पुस्तक वाचणार असाल तर तुमची निराशा होईल..!

कारण लेखकांनी या पुस्तकात अनेक विषयांना हात घातलेला आहे,त्यामुळे वरवर हे खूप सहज समजेल असे पुस्तक नाही.यात एकतर तुम्हाला स्वतंत्रपूर्व भारताचा अन् त्या काळातील जगाचा इतिहास जाणून घेण्याची किंवा काही प्रमाणात तो माहिती असायला हवा आहे.तेव्हाच हे पुस्तक तुम्हाला जवळचे वाटेल नाहीतर आपण फक्त जेलमधील नायकाचे वास्तव्य,त्याला येणाऱ्या अडचणी इतकंच या पुस्तकातून समजू शकू..!

पुस्तक अन् पुस्तकातील नायकाचा म्हणजे त्या पुस्तकातील जेलमध्ये कारावासाची शिक्षा भोगणर्या कैद्याचा हा सहा वर्षांचा प्रवास पत्रांच्या माध्यमातून खूप हळुवार लेखकाने पुस्तकात उलगडलेला आहे.नायकाला झालेली बारा वर्षांची शिक्षा पुढे ती कमी होवून सहा वर्षांची होते अन् त्याने या सहा वर्षात त्याच्या पत्नीशी केलेल्या पत्रव्यवहारास लेखकाने पुस्तकात उतरवले आहे..!

स्वतंत्रपूर्व काळात आपल्या देशासाठी अनेक क्रांतिकारकांनी सश्रम कारावास भोगला,यातीलच एक हे क्रांतिकारक असावे असे मला वाटते.कारण त्यांनी शेवटच्या पत्रापर्यंत कुठेही त्यांचा किंवा त्यांच्या पत्नीच्या नावाचा स्पष्ट उल्लेख केलेला पत्रात दिसुन येत नाही..!

सर्व पत्र नायकाने आपल्या पत्नीसाठी,प्रिय मित्रांसाठी,आप्तस्वकियांसाठी पत्नीच्या माध्यमातून लिहलेले आहेत. तुरुंगात कारावासाची शिक्षा भोगत असताना नायकानी अनेक पुस्तके,कादंबऱ्या,मासिके वाचली.जे देश विदेशातून त्याच्या पत्नीने,त्यांच्या मित्राने त्याला पाठवली आहे..!

कारावासात असताना त्याची झालेली तेथील अवस्था,राहणीमान,सभोवतालचे वातावरण,निसर्ग,त्याची खालवणारी तब्येत,पत्नीने,मित्रांनी वेळोवेळी पुस्तके पाठवूनही ते त्याला मिळत नसतात त्यामुळे त्याची होणारी गैरसोय हे सर्व काही लेखकाने या पत्रांच्या माध्यमातून लिहलेले आहे..!

त्याचा हा सर्व प्रवास अन या सर्वांच्या पलीकडे जगाशी असलेला त्याचा संबंध,सोबतच त्याने या सहा वर्षांच्या काळात जेलमध्ये केलेलं असंख्य लेखन वेळोवेळी त्याची अनेक जेलमध्ये होणारी बदली त्याने जेलमध्ये पाळलेली मांजर,जेल समोर लावलेली असंख्य फुलांची छोटीशी बाग अन् त्याचं तिला न्याहाळत रहाणं,त्याला एकट्याचा सहवास खूप आवडतो त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या कैद्यांसाठी त्याची होणारी चिडचिड अन् जेलमधून सुटल्यावर आपल्या भविष्यातील योजना हे सर्व लेखक या हळूवार प्रवासातून आपल्याला उलगडून सांगत असतात..!

तेव्हा नक्कीच वाचावं असं हे पुस्तक..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड