मुख्य सामग्रीवर वगळा

संगमेश्वराचं देऊळ..!

संगमेश्वराचं देऊळ..! 
संगेश्वराचं देऊळ..!

गावाला आलं की मी कुठे जावो न जावो या देऊळात न चुकता जातो म्हणजे जातो.ज्याप्रमाणे प्रत्येक गावाच्या एकांताला,एकांगाला महादेवाचं देऊळ असते अगदी त्याच पद्धतीनं हे ही देऊळ माझ्या गावाच्या अगदी एकांगाला,एकांतात आहे..!

तसं माझं,आमचं गाव सोडून आम्हाला बरीच वर्ष झाली,एखाद-दोन वर्षांचा असेल मी तेव्हा बाबांनी गाव सोडले अन् आमच्या शिक्षणाला म्हणून आम्ही तालुक्याच्या गावाला रहायला आलो,ते तालुक्यातच स्थिर झालो..!
परंतु गावाशी जोडलेली नाळ काही केल्या तुटली नाही,सनवार,लग्न,इतर कार्यक्रम,शेतीचे कामे असले की गावाला येणं होतं.गावाला शेती अन् धूळखात पडलेल जुन्या पद्धतीचं आमचं घर अजूनही आहे,जे शेवटच्या घटका मोजत आहे.जिथं माझं बालपण,वडिलांचं उभे आयुष्य याच्या जिवंतखुणा अजूनही दिसतात,त्यामुळे त्याचं नुतनीकरण करण्यास मन कधी धजावले नाही..!
घराच्या समोर असलेला वाहत्या शिवनामायचा परिसर,संत सावता माळ्याचे भव्यदिव्य मंदिर,हनुमानाचे कळसावर गरुड विराजमान असलेलं मंदिर,पुढे एकांगाला असलेलं संगेश्वराचं देऊळ अन् आयुष्याला शेवटचं वळण भेटलं की वेशीतून शेवटचा निरोप द्यायचा असतो ती गावची जुनी वेस,वेशी पल्याड स्मशानभूमी असं काही चित्र या जुन्या घरासमोरचे,घराला लागून असलेल्या जागेला राम लक्ष्मण सीतामाईच्या मंदिराला दान म्हणून आजोबांनी दिलेली जागा अन् या जागेत उभे असलेले सुंदर असे मंदिर..!
पहाटेची साखर झोपेतून येणारी जाग ही मंदिरात चालू असलेल्या काकडा आरतीने,घरासमोर असलेल्या पिंपळाच्या झाडावर असलेल्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने होते.रात्रीची झोपेची वेळ ही गावातल्या वारकरी असलेल्या माझ्या माऊलीच्या सुंदर अभंगानी होते.पहाटेच्या अन् सांजेच्या वेळी कितीवेळ शिवनामायच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहाला बघत नजरेत सामावून घेतलं जातं,त्यामुळेच की काय गावाशी जुळलेली नाळ मला इतक्या वर्षांनीसुद्धा गावाला घेऊन येते..!
शिवनामायच्या एकांगाला गुलमोहराच्या रानात शिवनामायच्या पात्रात असलेल्या बेसरमाच्या सानिध्यात संगेश्वराचं देऊळ वसलेलं आहे.काळाच्या ओघात वेळोवेळी याची डागडुजी करण्यात आली अन् इतिहासच्या खुणा मिटत गेल्या.या काळात तिथं वास्तव्य करत असलेल्या भामासाद महाराजांचे आपल्याला सोडून जाणं अन् त्यांचं वास्तव्य जोवर या देऊळात होतं तोवर छान वाटायचं पण अलिकडे फारसे मन त्या ठिकाणी रमत नाही एक कमी वेळोवळी जाणवते..!
कधीतरी गावाला आलं की या मंदिराच्या सभामंडपात घटकाभर बसून राहणं होतं,एकांताचा सानिध्यात चिंतन होतं,तेथे असलेल्या जुन्या लाकडी स्ल्याप असलेल्या आश्रमाची ऊब अनुभवता येते, काहीवेळ आयुष्याला घेऊन करत असलेल्या सर्वच अपेक्षा किती गौण आहे याचं भान या ठिकाणी होतं..!
अन् मग कितीवेळ शिवनामायच्या पात्राला असलेल्या दगडी पायऱ्यावर बसून संथ वाहणाऱ्या पाण्याला बघत राहणं होतं,नशिबात असेल तर कधीतरी नावड्याचा मासे पकडण्याचा,पात्रात जाळे टाकण्याचा खेळ अनुभवता येतो.कुणाच्या लेकीच्या,नातीच्या,नातवाच्या आसरा,कुणाचे जावळे फेडण्याच्या कार्यक्रमाला बघता येतं..!
सोबतच मग विचार येऊन जातो की शिवनामायच्या अंगाखांद्यावर खेळतच आपलं आयुष्य संपणार आहे,बाकी गोष्टी निमित्त लावलेलं आहे,आयुष्य जगण्याला कारण म्हणून आपण त्या गोष्टी करत असतो,जन्माला आल्यावर होणारे सोहळे,विधी तिच्या साहाय्याने अन् मृत्यू झाला की होणारे विधी,श्राद्धसुद्धा तिच्याच सानिध्यात होत असतात...!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...