मुख्य सामग्रीवर वगळा

संगमेश्वराचं देऊळ..!

संगमेश्वराचं देऊळ..! 
संगेश्वराचं देऊळ..!

गावाला आलं की मी कुठे जावो न जावो या देऊळात न चुकता जातो म्हणजे जातो.ज्याप्रमाणे प्रत्येक गावाच्या एकांताला,एकांगाला महादेवाचं देऊळ असते अगदी त्याच पद्धतीनं हे ही देऊळ माझ्या गावाच्या अगदी एकांगाला,एकांतात आहे..!

तसं माझं,आमचं गाव सोडून आम्हाला बरीच वर्ष झाली,एखाद-दोन वर्षांचा असेल मी तेव्हा बाबांनी गाव सोडले अन् आमच्या शिक्षणाला म्हणून आम्ही तालुक्याच्या गावाला रहायला आलो,ते तालुक्यातच स्थिर झालो..!
परंतु गावाशी जोडलेली नाळ काही केल्या तुटली नाही,सनवार,लग्न,इतर कार्यक्रम,शेतीचे कामे असले की गावाला येणं होतं.गावाला शेती अन् धूळखात पडलेल जुन्या पद्धतीचं आमचं घर अजूनही आहे,जे शेवटच्या घटका मोजत आहे.जिथं माझं बालपण,वडिलांचं उभे आयुष्य याच्या जिवंतखुणा अजूनही दिसतात,त्यामुळे त्याचं नुतनीकरण करण्यास मन कधी धजावले नाही..!
घराच्या समोर असलेला वाहत्या शिवनामायचा परिसर,संत सावता माळ्याचे भव्यदिव्य मंदिर,हनुमानाचे कळसावर गरुड विराजमान असलेलं मंदिर,पुढे एकांगाला असलेलं संगेश्वराचं देऊळ अन् आयुष्याला शेवटचं वळण भेटलं की वेशीतून शेवटचा निरोप द्यायचा असतो ती गावची जुनी वेस,वेशी पल्याड स्मशानभूमी असं काही चित्र या जुन्या घरासमोरचे,घराला लागून असलेल्या जागेला राम लक्ष्मण सीतामाईच्या मंदिराला दान म्हणून आजोबांनी दिलेली जागा अन् या जागेत उभे असलेले सुंदर असे मंदिर..!
पहाटेची साखर झोपेतून येणारी जाग ही मंदिरात चालू असलेल्या काकडा आरतीने,घरासमोर असलेल्या पिंपळाच्या झाडावर असलेल्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने होते.रात्रीची झोपेची वेळ ही गावातल्या वारकरी असलेल्या माझ्या माऊलीच्या सुंदर अभंगानी होते.पहाटेच्या अन् सांजेच्या वेळी कितीवेळ शिवनामायच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहाला बघत नजरेत सामावून घेतलं जातं,त्यामुळेच की काय गावाशी जुळलेली नाळ मला इतक्या वर्षांनीसुद्धा गावाला घेऊन येते..!
शिवनामायच्या एकांगाला गुलमोहराच्या रानात शिवनामायच्या पात्रात असलेल्या बेसरमाच्या सानिध्यात संगेश्वराचं देऊळ वसलेलं आहे.काळाच्या ओघात वेळोवेळी याची डागडुजी करण्यात आली अन् इतिहासच्या खुणा मिटत गेल्या.या काळात तिथं वास्तव्य करत असलेल्या भामासाद महाराजांचे आपल्याला सोडून जाणं अन् त्यांचं वास्तव्य जोवर या देऊळात होतं तोवर छान वाटायचं पण अलिकडे फारसे मन त्या ठिकाणी रमत नाही एक कमी वेळोवळी जाणवते..!
कधीतरी गावाला आलं की या मंदिराच्या सभामंडपात घटकाभर बसून राहणं होतं,एकांताचा सानिध्यात चिंतन होतं,तेथे असलेल्या जुन्या लाकडी स्ल्याप असलेल्या आश्रमाची ऊब अनुभवता येते, काहीवेळ आयुष्याला घेऊन करत असलेल्या सर्वच अपेक्षा किती गौण आहे याचं भान या ठिकाणी होतं..!
अन् मग कितीवेळ शिवनामायच्या पात्राला असलेल्या दगडी पायऱ्यावर बसून संथ वाहणाऱ्या पाण्याला बघत राहणं होतं,नशिबात असेल तर कधीतरी नावड्याचा मासे पकडण्याचा,पात्रात जाळे टाकण्याचा खेळ अनुभवता येतो.कुणाच्या लेकीच्या,नातीच्या,नातवाच्या आसरा,कुणाचे जावळे फेडण्याच्या कार्यक्रमाला बघता येतं..!
सोबतच मग विचार येऊन जातो की शिवनामायच्या अंगाखांद्यावर खेळतच आपलं आयुष्य संपणार आहे,बाकी गोष्टी निमित्त लावलेलं आहे,आयुष्य जगण्याला कारण म्हणून आपण त्या गोष्टी करत असतो,जन्माला आल्यावर होणारे सोहळे,विधी तिच्या साहाय्याने अन् मृत्यू झाला की होणारे विधी,श्राद्धसुद्धा तिच्याच सानिध्यात होत असतात...!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड