मुख्य सामग्रीवर वगळा

औद्योगिक वसाहती अन् काम करणारा मजूर वर्ग..!

औद्योगिक वसाहती अन् काम करणारा मजूर वर्ग..!


औद्योगिक वसाहतीत काम करणारा मजूरवर्ग अन् माझे नाते मला नेहमीच खूप जवळचे वाटत आले आहे,
का असे..?
याला उत्तर आपसूकच माहित नाही हे येतं..!
अलीकडे औद्योगिक वसाहतीत कंत्राटी पद्धतीने काम करायला म्हणून नोकरी शोधायला म्हणून येणाऱ्या तरुण मुलांच्या टोळक्या बघितल्या की,माझी नजर नेहमीप्रमाणे त्या माझ्या प्रत्येक जवळच्या मजूर मित्रांना शोधत असते.कारण त्या प्रत्येक मित्राच्या आयुष्यामागे प्रत्येकाची एक वेगळी कथा असते..!

त्यांचं जीवन न अनुभवतासुद्धा फक्त आपल्यात पारखायची कुवत असलेली नजर असली की आपण त्यांच्या या जीवनाशी संवाद करू लागतो..!
माझ्या परिस्थितीने मला ही पारखण्याची नजर लवकरच दिली किंवा त्या काबिल बनवलं,त्यामुळं औद्योगिक वसाहतीत कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या मित्रांच्या जगण्याची व्यथा,त्यांच्या जगण्यात असलेला संघर्ष माझ्या डोळ्यांना सहज दिसून येतो,त्यांच्या चेहऱ्यावरील ते भाव खूप सहज त्यांची आतून झालेली वाईट अवस्था मला कळून चुकते..!

औद्योगिक वसाहतीत काही ठराविक वेळेला वेळेला गेलं की,कावर्याबावर्या करत फिरणाऱ्या तरुणांच्या नजरा तुम्हाला दिसतील.यात कुणी अर्धवट शिक्षण झालेला अन् अलीकडे तर बऱ्यापैकी सुशिक्षित असलेला तरुणही यात असतो.कंत्राटी पद्धतीने कुठल्यातरी कंपनीत आपलं काम होईल म्हणून तो या कंपनीच्या गेटवरून त्या कंपनीच्या गेटवर भटकंती करत असतो..!

गेटवर सेक्युरिटी गार्डला विचारपूस केली की त्यांची ठरलेली तीच तीच उत्तरे पण पर्याय नसतो अन् सोबत एक अशीही आशा असते की कुठेतरी आपली दखल घेतली जाईल,आपले कागदपत्र तपासले जाईल अन् सहा महिने का होईना पण कंत्राटी पद्धतीने कामगार म्हणून आपल्याला त्या कंपनीत काम करता येईल.हा विचार करून भटकत असतात ही तरुण मुलं रोजगाराच्या संधी शोधत...

पर्याय नाहीये कारण उपलब्ध नसलेला रोजगार अन् दरवर्षी शिक्षण पूर्ण करून जॉबसाठी तयार होणाऱ्या मुलांच्या नवीन बॅचेस,कुठलाही नसलेला ताळमेळ.अनुभवी मुलांना असलेलं प्राधान्य अन् यामुळे फ्रेशर असलेल्या सुशिक्षत मुलांची नौकरीसाठी होत असलेली घुसमट,फजिती अन् त्यांचं हवालदिल होणं.हे सर्व खूप चिंता करायला लावणारं आहे..!

शेतीतून न झालेली आर्थिक प्रगती,आलेल्या नैसर्गिक आपत्ती,शेतमालाला न मिळणारा योग्य भाव,दिवसेंदिवस लोकसंख्या वाढ अन् शेतीचे कमी झालेलं क्षेत्र हे,शहराकडे मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होईल या आशेने शहराकडे वळणारा तरुण वर्ग आणि त्यामुळंच वाढलेली बेकारी अन् असे अनेक इतर कारणे यामुळे आपल्या पोटापाण्यासाठी पुन्हा एकदा शहराकडे वळलेला तरुण वर्ग..!

आज जेव्हा केव्हा औद्योगिक वसाहतीत नोकरीसाठी जाणं होतं,तेव्हा विविध कंपनीच्या गेटवर कंपनीत कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरती होण्यासाठी आलेला सुशिक्षित,अशिक्षित,अनुभवी,अनुभव नसलेला मजूर वर्ग बघितला की अनेक प्रश्न पडून जातात,आजच्या या तरुण पिढीचे भवितव्य किती अंधकारमय आहे..? त्याला कारणीभुत कोण..? याला पर्याय काय असेल..?

कंपनीत कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर का असेना काम मिळावे म्हणून चालू असलेला संघर्ष बघितला की जुने दिवस आठवतात,अजूनही काही बदलले नाहीये,तेव्हा अश्या वेळेला होणारी अवस्था खूप वाईट असते.दिवसभर काम भेटेल या आशेनं या कंपनीच्या गेटवरून त्या कंपनीच्या गेटवर फिरत राहणे,मिळाले तर सहा महिने काम नाही तर पदरी पडलेली निराशा...

अनेकदा कंपनीत काम भेटले तरी मिळणारी तुटपुंजी हजेरी अन् यातून न होणारा उदरनिर्वाह.पुन्हा गावाकडे असलेल्या आई वडिलांना असलेली काळजी,त्यांना यातून पाठवता येईल तितके पैसे पाठवणे अन् कित्येकदा कंपनीत एक वेळचे जेवण भेटते म्हणून त्या एक वेळच्या जेवणावर राहून एक वेळ चहा बिस्कीटवर जगणारी मित्रसुद्धा बघितले.अश्यावेळी आपण काही करू शकत नाही ही जाणीव खूप त्रास देणारी असते....

या व्यथा न संपणाऱ्या आहे त्यामुळं यावर कितीही लिहले तरी कमीच असेल,पण पर्याय म्हणून रोजगार निर्मितीची नवीन साधनं सुद्धा उपलब्ध व्हायला हवी आहे असे वाटते..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड