मुख्य सामग्रीवर वगळा

औद्योगिक वसाहतीत भेटलेला अवलिया..!

औद्योगिक वसाहतीत भेटलेला अवलिया..!

आयुष्याला घेऊन आपण कधीतरी खूप छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन समाधानी असतो तर कधीतरी आपण आपलं आयुष्य गुंतागुंतीचे करून घेतो अन् त्यातून मिळणारा सर्वोच्च कोटीचा जो आनंद आहे त्यात आपण खुश होत असतो.

अलिकडे आयुष्याला घेऊन जेव्हा विचार करतो तेव्हा हा विषय येतो अन् याबाबतीत खूप खोलवर विचार केला जातो तेव्हा आयुष्यात आपण आतापर्यंत एकतर खूप काही गमावलं किंवा येथून पुढे सर्वच अलबेल असले तर खूप काही मिळवू शकू याची प्रचिती येते..!

साधारण बाविशित असेल तेव्हा अाेद्योगिक वसाहतीत पहिल्यांदा कामाला गेलो कामाच्या अन् पगाराच्या बाबतीत सतत उंचीचा आलेख बघत असल्यानं,काही गोष्टी मला गौण वाटायच्या.साहजिक आहे त्यासाठी तितकी मेहनत करत असायचो,आयुष्याला,आयुष्यात आलेल्या क्षणांना तितके पिळून काढायला आवडायचं,मेहनत करायला आवडायचं..!

नेहमीप्रमाणे असेच एक दिवस दुसऱ्या शिफ्टमधले काम करून सुट्टी झाली अन् घरी परतायची वेळ झाली.साधारण पावणे बारा वाजलेले होते,कंपनीच्या गेट बाहेर आलो अन् थंडीचे दिवस असल्यानं हुडहुडी भरून आली.वर म्हंटल्याप्रमाणे नशिबाने खूप गोष्टी मला माझ्या आयुष्यात लवकर मिळाल्या त्यात एक वडिलांची दुचाकी गाडी होती...

थंडी खूप असल्यानं अवस्था वाईट झाली होती,गाडी जवळ येऊन बघतो तर गाडी पंक्चर झालेली.बरे बसून घेऊन जावं तर वालशिट कट होवून जाईल अन् ट्यूब बेकामी होईल अन् आजचा संपूर्ण काम केलेला पैसा त्यात जाईल म्हणून मी ती दुचाकी घेऊन एमआयडीसीच्या सूनसान रस्त्यानं पायी निघालो..!

साधारण बारा वाजले होते,हात थंडीने कुडकुडत होते.स्वेटर अंगात होते पण अंगकाठी खूप बारीक असल्यानं मी थंडीनं कुडकुडत,थरथर कापत होतो ते सहज लक्षात येत होते.कंपनीत अलिकडेच नव्याने झालेले मित्र मी पायी चालत असताना मला सोबतीला चालायला भेटले..!

आयुष्याला घेऊन जगण्याच सार ते मला सांगून गेले.रात्र पहुडली होती, काळजाला चर करणारा काळोख अन् काळोखात धुक्यांचे लोट दिसायचे.सूनसान रस्ता असल्यानं भिती वाटायची पण नवे मित्र असल्यानं गाडी लोटत चालत होतो..!

मी पहिल्यांदा असा पाई चालत होतो अन् आज हा अनुभव किती भयावह करणारा आहे याची प्रचिती येत होती,कारण याच काळोखाच्या रस्त्याने अनेक चोरी,लुटीच्या घटना रात्री काम करायला येणाऱ्या या मुलांसोबत झालेल्या आठवल्या पण आपण रोज गाडीवर जातो ही होणारी जाणीव सुखद होती..!

अन् एकीकडे एवढ्या थंडीत,चोरी लूटमारीचा धाक असूनही ही मुलं कुठलीही तक्रार न करता कित्येक वर्ष याच रस्त्यानं येजा करत होते, थंडी,ऊन,वारा,पाऊस यांचं त्यांना कुठलं सोयरसुतक नव्हतंच.मी नेहमीच Duty सुटल्यावर गाडीवर मागे बसून कुणाला घेऊन यायचो अन् मेन रोड आला की तिथे सोडून द्यायचो पण तिथून पुढं किती दूरपर्यंत ते पायी जायचे त्याचं काय..?

अश्या छोट्या छोट्या गोष्टींना घेऊन मी समाधानी होतो परंतु आयुष्याला घेऊन त्या मुलांकडे बघितले की आयुष्य इतकं खडतर परिस्थिती प्रवास करायला लावते याची प्रचिती यायची हे सगळं जवळून अनुभवल्या शिवाय अन् अनुभव घेतल्या शिवाय ती झळ आपल्या पर्यंत पोहचत नसते म्हणून मी आयुष्याला अनेकदा हे अनुभवण्यासाठी स्वतःला संकटात टाकून ते अनुभवलं ते वेगळं अन् आजचा हा अनुभव वेगळा होता..!

लख्ख काळोखाच्या अंधारातून रोडवर असलेल्या स्ट्रीट लाईटच्या उजेडाला आलो अन् मित्र त्यांच्या मार्गाला लागले काही दहा-पंधरा मिनिटे गाडीचा तोल सांभाळत पायी चालत असताना आयुष्याला घेऊन सर्वच विचार या पंधरा मिनिटांत करून घेतला जितका विचार आजवर कधी केला नव्हता..!

गाडी लोटत लोटत एका नावाला असलेल्या पंक्चरच्या दुकानवजा दुकान असलेल्या ठिकाणी आणली,पेंगुळलेल्या अवस्थेत असलेल्या त्या कारागिराला उठवले पैसा येणार म्हणून तोही ताडकन उठला.झोपला म्हणजे काही कॉटवर तो झोपला नव्हता तर जमिनीवरच पानकापड अंथरूण तो पहुडला होता..!

उठला हत्याराने टायर खोलले अन् पंक्चर चेक करायला म्हणून ते ट्यूब त्या गढूळ थंडगार पाण्यात हात घालून टायर फिरवू लागला,साफ करू लागला,थंडीने हात थरथर करत होते.तेव्हा मी ही फार बोलका असल्यानं कुठला..? किती कमावतो..? अशी प्रश्न केली.बोलणं झालं अन् बरीच प्रश्न जी आयुष्याला घेऊन पडली होती त्या प्रश्नांना उत्तरे नकळत मिळाली..!

उत्तरे होती एमपी से आया हुं भय्या..! कुछ ढाई-तीन सौ दिनरात करके कमा लेता हुं,तुम्हारे जैसा सिखा होता तो कोनसी कंपनी मे लग जाता.
बोलला पण कंपनीत आमची काय अवस्था असते त्याला काय सांगणार होतो..!

तो म्हंटला कित्ये कमाते हो..?
काय बोलणार त्याच्याकडे बघून सांगितलं कुछ नही आठ घंटे के तीन सौ तीस रुपये कमाता हुं,एक वखत का खाना,नाश्ता,चाय उपरसे मिलती है बस..!
काम क्या होता हैं..?
काम का मत पूछो भाई Casual हुं,साहाब जो बोलेंगे ओ करना पडता हैं..!
लेकीन अच्छा है जो है..!

सिखा होता तो मै बी आता,लेकीन अनपडगवार जो हुं..!
त्याच्या खांद्यावर हात ठेऊन म्हंटले,
भाई तेरा काम भी कुछ बुरा नही हैं,अच्छा कमा लेते हो और तुम ईमानदार हो तो तरक्की करोगे तुम..!

माझ्याकडे बघून तो चमकला..!
एरवी पंक्चर काढून टायर फिट करून झाले होते,हवा भरली होती त्यानं पुन्हा त्याचं हत्यारे गुंडाळले अन् मी ही हातात पैसे देऊन चल आता हुं..! म्हणून निघायला लागलो..!

भाईने काय करावं..?
जरा रोको म्हंटला अन् त्या गढूळ पाण्यात हात धुवून हात पुसले अन् भाई गळ्यात पडला,काय आनंद झाला होता माहीत नाही त्याला..!
त्या मिठीत कामाचा थकवा अन् आयुष्य या गोष्टींचा मला विसर पडला होता..!

मिलते रहेंगे म्हंटले अन् निघालो गाडी घेऊन घराची वाट जवळ करायला,तो दूरवर जास्तोवर मला बघत होता.आज मी खुश होतो आयुष्यात एक नवीन अनुभव आला होता,आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन पुन्हा बदलला होता..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड