मुख्य सामग्रीवर वगळा

LIFE WITH STARRY NIGHT..!

Life with THE STARRY NIGHT..!

माझ्या आयुष्यात मला काळोख ओळखीचा झाला आहे,व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या "The Starry Night" या सुंदर काळोखाशी भाष्य करणाऱ्या चित्राशी मी संवाद साधायचो अन् काळोखातून त्या चित्राद्वारे मी माझ्या आयुष्यात असलेल्या कल्पनांना घेऊन मी ते चित्र बघत मी ते क्षण जगायचो..!

मी नेहमीच म्हणतो की,आयुष्य सुखी जगण्याचं सूत्र खूप सोप्पं अन् खूप सहज उलगडणारे आहे.हो फक्त त्यासाठी आपल्याला त्या पैक व्हावं लागतं,त्या पैक व्हावं लागतं म्हणजे काय तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला आपला आनंद शोधायला शिकायचं,छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिकायचं..!

तर "The Starry Night" हे काळोखाशी भाष्य करणारं चित्रं अन् त्याला जोडून माझ्या आयुष्याशी असलेल्या जुजबी आवडी मिळून मी माझं आयुष्य जगत आहे,एरवी अलिकडच्या काही वर्षात आयुष्यात काळोख दाटला आहे.आयुष्याची गणितं कित्येकदा चुकून पुन्हा एकदा बरोबर येण्याच्या मार्गावर येऊन मला हुलकावणी देऊन जात आहेत..!

हुलकावणी म्हणजे माझ्या आयुष्यात सुद्धा काही गोष्टी ठरवून मी त्या होईल या विचाराने जगत असतो,फक्त त्या माफक अन् शुल्लक अपेक्षा आहे,ज्या खूप सहज पूर्ण होतील किंवा खूप अश्या मोठ्या नाहीत.परंतु अलीकडे या सर्व छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा माझं सुख शोधत असताना माझी बरीच आयुष्याला घेऊन तडजोड होत असते अन् त्यामुळे,
"The Starry Night" या सुंदर चित्रात शून्यात हरवलेला मी मलाच शोधू लागतो..!

आयुष्याला घेऊन आपण काही नियोजन करून आयुष्य जगत असू तर मला तरी वाटते आपली अवस्था ही "The Starry Night"  प्रमाणेच आयुष्यात असो किंवा त्या चित्रात कुठलाही ताळमेळ नसल्याप्रमाणे मला भासते.एकतर आयुष्यात "संदर्भ लावण्यात" असो किंवा "जरतर" या दोन गोष्टीमध्ये आपण आयुष्याचा बराच वेळ खर्ची करतो..!

आणि आयुष्यात काही गोष्टींचा संदर्भ लावण्यात आपण आपलं संपूर्ण आयुष्य किंवा ऐन उमेदीची काही वर्ष खर्ची करून टाकतो.मग आपलं आयुष्य "The Starry Night" या चित्राची न समजणारी दिशा जशी आहे त्याप्रमाणे मग आपल्याला आपले आयुष्य भासू लागते..!

मग आयुष्यात आलेला काळोख असो किंवा प्रकाश,अनवाणी पायांना भेटलेल्या अनोळखी वाटा हे सर्व या चित्राशी जुळून येतं..!
अन् मग मग पुन्हा शोध सुरू होतो हरवलेल्या वाटांचा,काळोखात हरवलेल्या प्रकाशाचा अन् आयुष्यातून हरवलेल्या रंगांचा..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...