मुख्य सामग्रीवर वगळा

LIFE WITH STARRY NIGHT..!

Life with THE STARRY NIGHT..!

माझ्या आयुष्यात मला काळोख ओळखीचा झाला आहे,व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या "The Starry Night" या सुंदर काळोखाशी भाष्य करणाऱ्या चित्राशी मी संवाद साधायचो अन् काळोखातून त्या चित्राद्वारे मी माझ्या आयुष्यात असलेल्या कल्पनांना घेऊन मी ते चित्र बघत मी ते क्षण जगायचो..!

मी नेहमीच म्हणतो की,आयुष्य सुखी जगण्याचं सूत्र खूप सोप्पं अन् खूप सहज उलगडणारे आहे.हो फक्त त्यासाठी आपल्याला त्या पैक व्हावं लागतं,त्या पैक व्हावं लागतं म्हणजे काय तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला आपला आनंद शोधायला शिकायचं,छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिकायचं..!

तर "The Starry Night" हे काळोखाशी भाष्य करणारं चित्रं अन् त्याला जोडून माझ्या आयुष्याशी असलेल्या जुजबी आवडी मिळून मी माझं आयुष्य जगत आहे,एरवी अलिकडच्या काही वर्षात आयुष्यात काळोख दाटला आहे.आयुष्याची गणितं कित्येकदा चुकून पुन्हा एकदा बरोबर येण्याच्या मार्गावर येऊन मला हुलकावणी देऊन जात आहेत..!

हुलकावणी म्हणजे माझ्या आयुष्यात सुद्धा काही गोष्टी ठरवून मी त्या होईल या विचाराने जगत असतो,फक्त त्या माफक अन् शुल्लक अपेक्षा आहे,ज्या खूप सहज पूर्ण होतील किंवा खूप अश्या मोठ्या नाहीत.परंतु अलीकडे या सर्व छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा माझं सुख शोधत असताना माझी बरीच आयुष्याला घेऊन तडजोड होत असते अन् त्यामुळे,
"The Starry Night" या सुंदर चित्रात शून्यात हरवलेला मी मलाच शोधू लागतो..!

आयुष्याला घेऊन आपण काही नियोजन करून आयुष्य जगत असू तर मला तरी वाटते आपली अवस्था ही "The Starry Night"  प्रमाणेच आयुष्यात असो किंवा त्या चित्रात कुठलाही ताळमेळ नसल्याप्रमाणे मला भासते.एकतर आयुष्यात "संदर्भ लावण्यात" असो किंवा "जरतर" या दोन गोष्टीमध्ये आपण आयुष्याचा बराच वेळ खर्ची करतो..!

आणि आयुष्यात काही गोष्टींचा संदर्भ लावण्यात आपण आपलं संपूर्ण आयुष्य किंवा ऐन उमेदीची काही वर्ष खर्ची करून टाकतो.मग आपलं आयुष्य "The Starry Night" या चित्राची न समजणारी दिशा जशी आहे त्याप्रमाणे मग आपल्याला आपले आयुष्य भासू लागते..!

मग आयुष्यात आलेला काळोख असो किंवा प्रकाश,अनवाणी पायांना भेटलेल्या अनोळखी वाटा हे सर्व या चित्राशी जुळून येतं..!
अन् मग मग पुन्हा शोध सुरू होतो हरवलेल्या वाटांचा,काळोखात हरवलेल्या प्रकाशाचा अन् आयुष्यातून हरवलेल्या रंगांचा..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड