मुख्य सामग्रीवर वगळा

LIFE WITH STARRY NIGHT..!

Life with THE STARRY NIGHT..!

माझ्या आयुष्यात मला काळोख ओळखीचा झाला आहे,व्हिन्सेंट व्हॅन गॉगच्या "The Starry Night" या सुंदर काळोखाशी भाष्य करणाऱ्या चित्राशी मी संवाद साधायचो अन् काळोखातून त्या चित्राद्वारे मी माझ्या आयुष्यात असलेल्या कल्पनांना घेऊन मी ते चित्र बघत मी ते क्षण जगायचो..!

मी नेहमीच म्हणतो की,आयुष्य सुखी जगण्याचं सूत्र खूप सोप्पं अन् खूप सहज उलगडणारे आहे.हो फक्त त्यासाठी आपल्याला त्या पैक व्हावं लागतं,त्या पैक व्हावं लागतं म्हणजे काय तर छोट्या छोट्या गोष्टीमध्ये आपल्याला आपला आनंद शोधायला शिकायचं,छोट्या छोट्या गोष्टीमध्ये समाधानी राहायला शिकायचं..!

तर "The Starry Night" हे काळोखाशी भाष्य करणारं चित्रं अन् त्याला जोडून माझ्या आयुष्याशी असलेल्या जुजबी आवडी मिळून मी माझं आयुष्य जगत आहे,एरवी अलिकडच्या काही वर्षात आयुष्यात काळोख दाटला आहे.आयुष्याची गणितं कित्येकदा चुकून पुन्हा एकदा बरोबर येण्याच्या मार्गावर येऊन मला हुलकावणी देऊन जात आहेत..!

हुलकावणी म्हणजे माझ्या आयुष्यात सुद्धा काही गोष्टी ठरवून मी त्या होईल या विचाराने जगत असतो,फक्त त्या माफक अन् शुल्लक अपेक्षा आहे,ज्या खूप सहज पूर्ण होतील किंवा खूप अश्या मोठ्या नाहीत.परंतु अलीकडे या सर्व छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा माझं सुख शोधत असताना माझी बरीच आयुष्याला घेऊन तडजोड होत असते अन् त्यामुळे,
"The Starry Night" या सुंदर चित्रात शून्यात हरवलेला मी मलाच शोधू लागतो..!

आयुष्याला घेऊन आपण काही नियोजन करून आयुष्य जगत असू तर मला तरी वाटते आपली अवस्था ही "The Starry Night"  प्रमाणेच आयुष्यात असो किंवा त्या चित्रात कुठलाही ताळमेळ नसल्याप्रमाणे मला भासते.एकतर आयुष्यात "संदर्भ लावण्यात" असो किंवा "जरतर" या दोन गोष्टीमध्ये आपण आयुष्याचा बराच वेळ खर्ची करतो..!

आणि आयुष्यात काही गोष्टींचा संदर्भ लावण्यात आपण आपलं संपूर्ण आयुष्य किंवा ऐन उमेदीची काही वर्ष खर्ची करून टाकतो.मग आपलं आयुष्य "The Starry Night" या चित्राची न समजणारी दिशा जशी आहे त्याप्रमाणे मग आपल्याला आपले आयुष्य भासू लागते..!

मग आयुष्यात आलेला काळोख असो किंवा प्रकाश,अनवाणी पायांना भेटलेल्या अनोळखी वाटा हे सर्व या चित्राशी जुळून येतं..!
अन् मग मग पुन्हा शोध सुरू होतो हरवलेल्या वाटांचा,काळोखात हरवलेल्या प्रकाशाचा अन् आयुष्यातून हरवलेल्या रंगांचा..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...