मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्य_Cricket..!

 आयुष्य_Cricket..!

माझ्या अस्वस्थतेच्या काळात काही सकाळ मला उगाच प्रसन्न वाटतात अन् दिवसाची झालेली प्रसन्न सकाळ पुन्हा एकदा आठवांचे दिवस घेऊन आठवणीला येतात.आज खूप दिवसांनी म्हणजे तब्बल काही वर्षांनी पहाटेच तालुक्याच्या क्रीडा संकुलाला भेट दिली अन् क्रिकेटसाठी असलेलं लहानपणीचे वेड त्यासाठी पहाटेच मित्रांसमवेत हातात बॅट,बॉल घेऊन क्रीडा संकुलाकडे होत असणाऱ्या धावा आठवल्या..!

लहानपणी करिअर म्हणून किंवा भविष्यात आपल्याला काय करायचं आहे हे अनेकांना माहीत नसते,त्यातलाच मी एक मग अश्यावेळी जे आवडेल ते करायचं.त्यातच उत्तुंग यश संपादन करायचं अन् यशाच्या सर्वात उंचाच्या शिखरावर जाऊन बसायचं,मग त्यासाठी खूप मेहनत घ्यायची.हेच क्रिकेटच्या बाबतीत पण हे खूळ काही वर्षांसाठीच मनावर स्वार झालेलं,पुढे जसे प्रत्येक आवडीनिवडीला वेळ असताच पूर्णविराम दिला,त्यातील ही सुद्धा एक आवड अन् 
भविष्यात काय करायचं..? या प्रश्नाला काही वर्षांसाठी मिळालेलं उत्तर होतं..!

आयुष्याला घेऊन लहानपणी आपण खूप विचार करत असतो,प्रत्येक नव्या गोष्टीत आपल्याला कुतूहल वाटत असते,त्या प्रत्येक गोष्टीचा खोलात जावून आपण विचार करत असतो.त्या गोष्टीला भूतकाळातील,वर्तमान काळातील संदर्भ जोडून उद्याच्या भविष्य काळासाठी आपण स्वप्न बघत असतो..!

म्हणूनच कदाचित म्हणत असतात,ऐन कळत्या वयात जेव्हा आपल्याला भविष्यात काय करायचं..? या प्रश्नासाठी मार्ग निवडलेले असले की आयुष्याला घेऊन होणारी तडजोड ही फार मोठ्या प्रमाणात जाणवत नाही अन् आपण यशस्वी होण्याकडे आपली वाटचाल करू लागतो..!

हे सगळं आठवायचे कारण हेच की,आज क्रीडा संकुलात उद्याच्या भविष्याला घेऊन आज म्हणजे वयाच्या साधारण पंधराव्या वर्षापासूनच त्या स्वप्नांना आकार देणारी ही लहान मुलं भेटली.त्यांचं आपल्या स्वप्नासाठी तयार होणं बघितलं तर नक्कीच वाटतं की भविष्यात अंतराष्ट्रीय स्तरावर भारतीय क्रिकेट संघात यापैकी एकतरी मुलगा आपलं प्रतिनिधित्व करेल..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...