मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्याची वाटचाल..!

आयुष्याची वाटचाल..!

आयुष्याला घेऊन जेव्हा विचार करतो तेव्हा मला खूप स्पष्ट अशी एकच गोष्ट वाटते की,जिथं कुठल्याही शक्यता,उद्याचा विचार केला जात नसेल म्हणजे हे फक्त माझ्या नजरेतून.आयुष्यात आयुष्याच्या उत्तरार्धात किंवा आयुष्यभर तुला काय करायला आवडेल..? असा प्रश्न मला कुणी विचारला की मी खूप सहज सांगून जातो की मला फक्त चालत रहायला आवडेल..!

होय मला फक्त चालायला आवडेल,मग त्या चालण्यासाठी नसेल कुठला उद्देश किंवा काहीतरी साध्य करायचं आहे म्हणून माझं चालणं.कारण फक्त मिळेल त्या रस्त्यानं भटकण्यात अन् रोज आपल्याच विश्वात आपल्याला नव्याने बघायला भेटणाऱ्या ठिकाणांना,निसर्गाला अनुभवण्यात जे सुख आहे ते आपल्या रोजच्या धकाधकीच्या जीवनात नाही..!

आजही ठरवून माझं ओळखीच्या प्रदेशात पाच सात किमी रोजचं चालणं होतं पण रोजचा हा ओळखीचा प्रदेशसुद्धा मला नियमित रोज नव्याने भेटत असतो.निसर्गाला आपण जवळ केलं अन् निसर्गाच्या सान्निध्यात राहून रोजच रोजच्याप्रमाणे त्यात होणारे छोटे छोटे बदल बघितले की आयुष्याला घेऊन आपण काही अपेक्षांसाठी खूप काही मिस करतोय असं वाटायला लागतं..!

खूपवेळा निसर्गाच्या सान्निध्यात राहून डोळ्यांना सामोरी दिसणाऱ्या वाटाशी बोलायचं,पायाशी लोळण घेणाऱ्या मातीशी बोलायचं,कधीतरी जमिनीशी बोलत बोलत तिच्यावर उगलेल्या अन् आपल्या आयुष्याचा शेवट मोजणाऱ्या,सुकलेल्या तृणास बोलायचं,छोटे छोटे फुलं त्यांचं काही महिन्यांचं आयुष्य जे निर्व्याज,कुठलीही अपेक्षा न करता जगणं हे खूप सुंदर आहे..!
जे आपण डोळ्यांनी अन् मनाला त्यांच्याकडे बघण्याची,परखण्याची नजर लाभली की बघत बसायचं,संवाद करत राहायचं त्यांच्याशी..!

वाटेला लागून असलेली आपला शेवटचा काळ मोजत असलेली बोडकी बाभूळ दिसली की तिच्या कृश झालेल्या फांद्यावर एकदा प्रेमानं हात फिरविण्यात जे सुख लाभते,मऊ हाताला तिचा जो अनुभवी,रापलेला स्पर्श होतो त्यावेळी कित्येक दशकांचा इतिहास ती तिच्या माध्यमातून आपल्याला सांगू बघत असते..!

कधीतरी काटेरी धोत्रा अन् त्याच्याशी खेळत असलेल्या त्याच्या पिवळ्या रंगाच्या फुलांशी स्पर्शाची भाषा करून बोलतं व्हायचं,त्याच्या काटेरी विश्वात अलवार,हळुवार जपलेलं मऊपण खूप सहज अनुभवायला मिळते अश्यावेळी.कधीतरी करवंदाच्या जाळ्यांशी बोलायचं त्यांचं हिरवेपण अन् काट्यांचा बोचणारा स्पर्श आपल्याला आयुष्यातील अनेक गणितं  सोडवायला भाग पाडतो..!

त्यामुळं आयुष्यभर किंवा आयुष्याच्या उत्तरार्धात फक्त चालत राहायचं,निसर्गाला जवळ केलं की निसर्ग आपल्याला त्याच्याजवळ करतो अन् मग त्याच्या आत लपलेली असंख्य गुपिते ती आपल्या समोर उघडी करतो.निसर्ग आपल्याला भरभरून देतो फक्त त्याला पात्र आपली कुवत हवी अन् हे पात्र असणं इतकं सहज नसतं,त्यासाठी आयुष्यातील अनेक गोष्टींचा त्याग आपल्याला करावा लागतो..!

निसर्गाच्या सान्निध्यात चालत राहिले,भटकत राहिले की आयुष्याला घेऊन केलेल्या अपेक्षांचा आलेख ओझरता होवू लागतो,शून्यातसुद्धा आपण मग समाधानी अन् एक उंचीवरचे आयुष्य जगत असतो.मग निसर्गातील दगड,धोंड्यांची निसर्गाने निर्माण केलेली भाषा आपल्याला उमगायला लागते.नदीचं वाहते पाणी आपल्याशी संवाद करू लागते,कधीतरी आयुष्याला घेऊन अजूनही आपण काही अपेक्षा करतो का..?  हा ही प्रश्न मग ते आपल्याला करू लागते,जेव्हा याचं उत्तर मनालाच नाही असं येतं तेव्हा आयुष्याला घेऊन आपण यशस्वी झालेलो असतो...!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड