मुख्य सामग्रीवर वगळा

अनोखा मुसाफिर..!

अनोखा मुसाफिर..!


दोन-तीन दिवसांपूर्वी औरंगाबाद गेलो असतांना रात्री नात्यातील एका भावाच्या फ्लॅटवर थांबलो होतो.मी थांबलो त्याच संध्याकाळी त्याचा दुसरा मित्र जो हरियाणा राज्यातील रोहतक जिल्ह्यातील आहे,तो ही ट्रेनने औरंगाबाद येथे येत होता..!
जो की संपूर्ण देशभरात त्याच्या स्वतःच्या व्यवसायनिमित्त मार्केटिंग अन् सोबतच त्याच्या प्रॉडक्टचे सेल करण्यासाठी फिरत असतो..!

तो स्टेशनवर आल्याचे त्याने आम्हाला कळवले अन् त्याला भाऊ म्हंटला की स्टेशनवर तुला घ्यायला येतो,तर तो नाही बोलला अन् तो स्वतःच भावाच्या फ्लॅटवर आला,इथे तो पहिल्यांदाच येत होता..!
तो आला त्याची माझी यापूर्वी कधी भेट नव्हती,की कधी बोलणे तो माझ्यासाठी संपूर्ण नवा होता...!
मला नवीन माणसांबद्दल नेहमीच जाणून घेण्याची इच्छा असते,त्यामुळं मग त्यांच्या दोघांच्या गप्पात विषेश लक्ष देत मी ही सर्व ऐकत होतो,त्याच्याशी बोलतही होतो,तोही बोलत होता..!

रात्रीचे जेवण झाले अन् आम्ही पुन्हा एकदा गप्पा मारायला लागलो.त्याच्या बोलण्यातून त्याची ओळख होवू लागली होती.चाळीशीत असणारा तो साधारण मित्र त्याच्या आजोबांच्या बाबतीत सांगत होता,ते मूळचे पाकिस्तानमधील परंतु देशाची फाळणी झाली अन् ते भारतात आले.त्यांच्याजवळ अंगावरील कपड्याखेरीच काहीही नव्हते,पुढे खूप मेहनत करून ते भारतात हरियाणा रोहतक येथे स्थिर झाले..!

खूप मेहनत परंतु नशिबी असलेली गरिबी अन् याची असलेली जाणीव त्याच्या बोलण्यातून कळत होतं की आपल्याला काहीही करायचे असेल तर मेहनतीला पर्याय नाही अन् तिच्याशिवाय काही शक्यही नाही..!
पुढे त्याच्या व्यवसायाबद्दल मला जाणून घ्यायला आवडेल असे मी त्याला म्हंटले अन् त्याने मला सविस्तर सर्व काही सांगितले..!

तो संपूर्ण भारतात कुठल्याही शहरात टू-व्हीलरचे सुटे पार्टस कंपनीकडून घेऊन ऑटोपार्टसच्या दुकानांना विकत होता,यात तो अन् त्याचा भाऊ हे दोघेही हे काम करायचे.त्याच्या बोलण्यातून कळाले की त्याचा भाऊ या व्यवसाय निमित्त येथे लवकरच स्थिर होणार आहे.कारण औरंगाबाद शहर ऑटो मोबाईल क्षेत्रातील प्रगती पथावर असलेलं शहर आहे अन् हे तो ही वेळोवेळी हे सांगत होताच..!

पुढे त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल त्याला विचारले असता कळले की तो या किंवा याशी जोडलेल्या व्यवसायात वयाच्या सोळाव्या वर्षी पडला अन्  तो अशिक्षित आहे.फक्त थोडीफार इंग्लिश भाषेची त्याला असलेली ओळख अन् रोजच्या आयुष्यात लागणारी गणितं त्याला जमतात अन् या जोरावर तो आपल्या अनुभवाला घेऊन व्यवसायानिमित्त संपूर्ण देशभरात फिरत असतो..!

तो इतका सर्व फिरता असल्यामुळे तो मनकवडा ही असावा कदाचित कारण आपल्या बोलण्यातून आपल्याला काय बोलायचं आहे,आपला सूर बोलण्यातून कुठे जातो आहे हे त्याला सहज कळायचं.त्याच्या व्यवसायाबद्दल अन् वैयक्तिक आयुष्याबद्दल तो भरभरून बोलत होता मी ऐकत होतो..!

संपूर्ण भारतात फिरून त्याने पंजाबी,बंगाली,तामिळी,उर्दू,केरळी भाषासुद्धा बोलायला शिकून घेतल्या होत्या अन् आता बऱ्यापैकी मराठीसुद्धा तो बोलायला शिकलेला होता.हे बघून खरच त्याच्याबद्दल मनात आदर काही पट जेव्हा तो आला त्यानंतर वाढला होता..!

आपण नेहमीच तक्रारी करत असतो हे असे नाही तसे हवे किंवा हे शक्य नाही ते करू,असं तो काहीही बोलत नव्हता..!
तो फक्त म्हणायचा मेहनत करो और किसी भी काम को दिलसे करो,काम हो जायेंगा..!
पढे लिखे लोग भी मेहनत करते हैं खाली काममे थोडा बहुत फरक होता हैं,लेकीन मेहनत तो होती ही हैं ना..!

पुढे खूप गप्पा झाल्या तारुण्यातील त्याच्या आठवणींना त्याने उजाळा दिला,सोबतच लॉकडाऊनचा काळ त्याच्या आयुष्यातील किती वाईट काळ होता हे ही त्यानं सांगितलं.एका छोट्याश्या चुकीमुळे त्याच्यावर रेल्वे पोलिसांनी केलेली केस अन् त्या केससाठी त्याला एक वर्ष शोधत फिरणारे पोलिस पुढे तो त्यांना भेटला दीड वर्ष केस चालली कोर्ट,पोलिस पुढे शिक्षा,दंड भरून तो सुटला अन् एका चुकीमुळे ऐन उमेदीचे दीड वर्ष आपल्या हातातून सुटून गेले याचं त्याला झालेलं दुःख तो सांगत होता..!

तो बोलत होता मी ऐकत होता,कधी त्याच्या जागेवर मला ठेवून बघत होतो तर कधी मी इतका शिकूनही मी असा विचार का केला नाही हा ही विचार करत होतो.घड्याळीत रात्रीचा एक-सव्वा कधी वाजला कळलाच नाही,गप्पा चालू होत्या त्या आवरत्या घेतल्या अन् त्याच्या उद्याचा कामाचा बिझी शेड्युल बघून त्याला झोपायला म्हणून सांगितले अन् मी ही झोपलो.ते सर्व विचार डोक्यात चालूच होते,कधीतरी आपण आयुष्याकडे खूपच अपेक्षा करतो की काय असे मला वाटायला लागले होते..! 

तो सकाळी साडेपाचला उठला समोरच्या व्यक्तीला फोन लावला कदाचित त्याला बोलावणं आलं असावं,कंपनीतून काही पार्टस घ्यायचे होते त्याची प्रोसेस करण्यासाठी तो सकाळीच आवरून औद्योगिक वसाहतीकडे निघूनही गेला.निघतांना म्हंटला की मिलेंगे तुम्हारे शहर आये तो कभी,आज श्याम फिर कलकत्ता जो जाना हैं..!
काय बोलावं मी निःशब्द होतो,त्याला नंबर दिला अन् तो पुढील प्रवासाला लागला..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड