मुख्य सामग्रीवर वगळा

माई एक पर्व..! 💙

माई एक पर्व..! 💙

साधारण दुसऱ्या लॉकडाऊनमधील ही गोष्ट असावी,माझं ऑनलाईन कॉलेज चालू होते अन् या काळात मी जॉब सोडला होता तसा अजूनही सोडलाच आहे.नेहमीप्रमाणे दुपारचे जेवण झाले,अभ्यास झाला अन् मी आणि आई टीव्ही बघत बसलो होतो..!

टीव्हीवर चॅनल बदलत असतांना आईला "सिंधूताई सपकाळ" यांच्या भूमिकेतील अभिनेत्री "तेजस्विनी पंडित" बघितली अन् आईने मला ते चॅनल पुन्हा लावायला सांगितले, लावलं अन् त्या चॅनलवर "मी सिंधूताई सपकाळ" हा चित्रपट चालू होता.
एरवी सध्या घरी फक्त मी अन् आईच असल्यामुळे आम्ही रोज सायंकाळी जेवण झाले की यु-ट्यूबवर भजन,कीर्तन,कविता,व्याख्यान ऐकत बसलेलो असतो..!

अलिकडे आईला त्या एक विचारसरणी असलेल्या टीव्हीवरील सिरियल बघायला आवडत नाही,म्हणून मग आम्ही सायंकाळी ठरलेल्या वेळेत मोबाईलवर वरील सर्व गोष्टी बघत,ऐकत असतो..!

एक दिवस सहज यु-ट्यूबवर स्क्रोल करतांना आईनं "सिंधूताई सपकाळ" (माई) यांचा जीवनसंघर्ष,स्मशानात प्रेतावर भाजलेली भाकर अन् तो सर्व खडतर प्रवास बघितला.त्यापूर्वी आई माईबद्दल जाणून होती पण आईच्या आयुष्यात गेले काही वर्ष सोडले तर तिला कामातून उसंत नव्हता.त्यामुळे आईही किती जाणून असणार माईबद्दल,त्या दिवशी आईने अन् मी तो काही मिनिटांचा व्हिडिओ संपूर्ण बघितला अन् आईला आईचा संघर्षमय जीवन प्रवास आठवला..!

त्याही दिवशी आईनं अन् मी,होय मी (मी कधीही चित्रपट बघत नाही) पण तो संपूर्ण दोन-अडीच तासांचा चित्रपट बघितला.अन् तो बघून झाल्यावर आई मला बोलती झाली की तुझे बाबा आपल्याला सोडून गेले तेव्हा मी बापाविना पोरके झालेल्या मुलांचा सांभाळ केला,माझं कर्तव्य पार पाडले.माईसारखाच पण माई इतका नाही पण काही अंशी आयुष्यात संघर्ष केला अन् हे मला सांगणे नको होते कारण त्या संघर्षात आम्ही तिघे भाऊ-बहीण आईच्या नेहमीच सोबत होतो..!

आई पुढे बोलली मी तुम्हाला इतकं शिकवलं,आज आपल्या घराण्यात सर्वाधिक शिकलेला तू आहेस अन् हे खरे आहे. तर माझा इतकासा संघर्ष परंतू मायीनं तर तिच्या आयुष्यात आयुष्यभर संघर्ष केला.पुढे हजारो अनाथ मुलांची माई आई झाली,त्यांना शिक्षण दिले त्यांना योग्य मार्गाला लावले,अनेक मुलींना शिकवले त्यांचे संसार फुलवले अन् मायी खऱ्या अर्थानं हजारो अनाथ मुलामुलींची आई झाली..!

पुढे आई बोलती झाली की माईला एकदा भेटायचं आहे आयुष्यात अन् ती भेट तू घडवून देशील..!
कारण माईची मुलगी "ममताताई" कविता करते हे मी आईला सांगितले होते.खूपवेळा आईला मी ममताताईच्या कविता ऐकवल्या,वाचून दाखवल्या होत्या.दोघी मायलेकीच्या एफबीवरील पोस्ट मी आईला नेहमी दाखवत असल्यानं आई हे सर्व जाणून होती.मलाही माईचा हा प्रवास बघून भेटण्याची इच्छा होतीच..!

पण काल साधारण याच वेळेला टीव्ही बघत असतांनाच न्यूजवर एकाकीच माई आपल्याला कायमची सोडून गेली हे कळलं.आईला काय सांगावं कळत नव्हतं खूप जड अंःतकरणाने आईला सांगितले आई माई सोडून गेली,मला आईनं काय बोलावं..!

आई फक्त शांत बसून होती अन् माईचा तो जीवनप्रवास जो ग्राफिटीच्या माध्यमातून वाचत,बघत बसली होती.शेवट आई एकच वाक्य बोलली 
माईला भेटायचं राहून गेलं रे आपलं बेटा,भेटायला हवं होतं आपण..!
मी काय बोलावं सुचत नव्हतं..!

माई कायम आठवणीत असशील..! 💙

Bharat Sonwane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड