मुख्य सामग्रीवर वगळा

माई एक पर्व..! 💙

माई एक पर्व..! 💙

साधारण दुसऱ्या लॉकडाऊनमधील ही गोष्ट असावी,माझं ऑनलाईन कॉलेज चालू होते अन् या काळात मी जॉब सोडला होता तसा अजूनही सोडलाच आहे.नेहमीप्रमाणे दुपारचे जेवण झाले,अभ्यास झाला अन् मी आणि आई टीव्ही बघत बसलो होतो..!

टीव्हीवर चॅनल बदलत असतांना आईला "सिंधूताई सपकाळ" यांच्या भूमिकेतील अभिनेत्री "तेजस्विनी पंडित" बघितली अन् आईने मला ते चॅनल पुन्हा लावायला सांगितले, लावलं अन् त्या चॅनलवर "मी सिंधूताई सपकाळ" हा चित्रपट चालू होता.
एरवी सध्या घरी फक्त मी अन् आईच असल्यामुळे आम्ही रोज सायंकाळी जेवण झाले की यु-ट्यूबवर भजन,कीर्तन,कविता,व्याख्यान ऐकत बसलेलो असतो..!

अलिकडे आईला त्या एक विचारसरणी असलेल्या टीव्हीवरील सिरियल बघायला आवडत नाही,म्हणून मग आम्ही सायंकाळी ठरलेल्या वेळेत मोबाईलवर वरील सर्व गोष्टी बघत,ऐकत असतो..!

एक दिवस सहज यु-ट्यूबवर स्क्रोल करतांना आईनं "सिंधूताई सपकाळ" (माई) यांचा जीवनसंघर्ष,स्मशानात प्रेतावर भाजलेली भाकर अन् तो सर्व खडतर प्रवास बघितला.त्यापूर्वी आई माईबद्दल जाणून होती पण आईच्या आयुष्यात गेले काही वर्ष सोडले तर तिला कामातून उसंत नव्हता.त्यामुळे आईही किती जाणून असणार माईबद्दल,त्या दिवशी आईने अन् मी तो काही मिनिटांचा व्हिडिओ संपूर्ण बघितला अन् आईला आईचा संघर्षमय जीवन प्रवास आठवला..!

त्याही दिवशी आईनं अन् मी,होय मी (मी कधीही चित्रपट बघत नाही) पण तो संपूर्ण दोन-अडीच तासांचा चित्रपट बघितला.अन् तो बघून झाल्यावर आई मला बोलती झाली की तुझे बाबा आपल्याला सोडून गेले तेव्हा मी बापाविना पोरके झालेल्या मुलांचा सांभाळ केला,माझं कर्तव्य पार पाडले.माईसारखाच पण माई इतका नाही पण काही अंशी आयुष्यात संघर्ष केला अन् हे मला सांगणे नको होते कारण त्या संघर्षात आम्ही तिघे भाऊ-बहीण आईच्या नेहमीच सोबत होतो..!

आई पुढे बोलली मी तुम्हाला इतकं शिकवलं,आज आपल्या घराण्यात सर्वाधिक शिकलेला तू आहेस अन् हे खरे आहे. तर माझा इतकासा संघर्ष परंतू मायीनं तर तिच्या आयुष्यात आयुष्यभर संघर्ष केला.पुढे हजारो अनाथ मुलांची माई आई झाली,त्यांना शिक्षण दिले त्यांना योग्य मार्गाला लावले,अनेक मुलींना शिकवले त्यांचे संसार फुलवले अन् मायी खऱ्या अर्थानं हजारो अनाथ मुलामुलींची आई झाली..!

पुढे आई बोलती झाली की माईला एकदा भेटायचं आहे आयुष्यात अन् ती भेट तू घडवून देशील..!
कारण माईची मुलगी "ममताताई" कविता करते हे मी आईला सांगितले होते.खूपवेळा आईला मी ममताताईच्या कविता ऐकवल्या,वाचून दाखवल्या होत्या.दोघी मायलेकीच्या एफबीवरील पोस्ट मी आईला नेहमी दाखवत असल्यानं आई हे सर्व जाणून होती.मलाही माईचा हा प्रवास बघून भेटण्याची इच्छा होतीच..!

पण काल साधारण याच वेळेला टीव्ही बघत असतांनाच न्यूजवर एकाकीच माई आपल्याला कायमची सोडून गेली हे कळलं.आईला काय सांगावं कळत नव्हतं खूप जड अंःतकरणाने आईला सांगितले आई माई सोडून गेली,मला आईनं काय बोलावं..!

आई फक्त शांत बसून होती अन् माईचा तो जीवनप्रवास जो ग्राफिटीच्या माध्यमातून वाचत,बघत बसली होती.शेवट आई एकच वाक्य बोलली 
माईला भेटायचं राहून गेलं रे आपलं बेटा,भेटायला हवं होतं आपण..!
मी काय बोलावं सुचत नव्हतं..!

माई कायम आठवणीत असशील..! 💙

Bharat Sonwane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...