मुख्य सामग्रीवर वगळा

त्या दोघी..!

त्या दोघी..!

सर्वत्र रात्रीचा काळोख पसरला आहे,रात्रीची थंडी अंगावर येते आहे अन्  एकाकीच साडेबाराच्या ठोक्याला तिचा आवाज कानी पडतो अन् त्या दोघींची भांडणे चालू असेल का..? की दोघी दारू प्यायला असतील म्हणून इतक्या मोठ्या आवाजात शिव्या देत त्या कचाकच भांडत आहेत,असतील.

अलीकडे म्हणजे बहुत दिवसांपूर्वी कळलं त्या जगण्यासाठी कुठल्याही हद्दीला जावू शकता,दिवसभर त्या मिळेल ते काम करत असतात.शेजारच्या परिसरात प्लॅस्टिकच्या बाटल्या जमा करून त्या भंगारवाल्याला विकून त्याचा पैसा करता अन् काहीतरी आणून खातात.त्यांच्या झोपडीची चूल कधीच मला विस्तवाने जळताना दिसली नाही,कधीतरी काही हाती लागलं नाही की शेजारीच असलेल्या नाल्यात एक फाटकी साडी त्यांनी मासे पकडायच्या जाळ्याप्रमाणे लावून दिलेली आहे,वेळोवळी त्या जाळ्यात जे काही मासे,पानकोंबड्या,खेकडे येतात पहाटीच धुंडाळून त्या ते आणून भाजून खावून घेतात..!

कधीतरी अंघोळ करावी वाटली तर त्या पाण्यातच तीही करून घेता,एकांगाला असल्यानं तिकडं कुणी भटकतही नाही पण त्यांचा असा आवाज आला की काळीज चिरत जाते.कारण मग त्या दारू प्यायलेल्या अवस्थेत एकमेकांना मारताही तर कधी आनंदी असल्या की दारूच्या नशेत नाचताही.त्यांनी पाळलेली कुत्रे सतत त्यांच्या चौफेर फिरत असतात,त्यामुळे त्यांना चोर किंवा कुणी येईल मारेल किंवा काही विचित्र वागेल याचं भय नसावं अन् कदाचित त्या तितक्या शुद्धीतही नसतात.आता मोठ्यानं ओरडू लागल्या आहे,त्यांच्या आवाजात सुर मिळवून त्यांचे कुत्रेही इवळत मोठमोठ्याने भुंकत आहे..! 

त्या कोण असतील..? त्यांचं नातं काय असावं..? हे आजवर कळलं नाही किंवा मी ते जाणून घेण्यासही उत्सुक नव्हतो.कधीतरी त्या दोघींचे नाते मला आई अन् मुलीचे वाटते तर कधीतरी सासू सूनेचे तर कधी त्या म्हाताऱ्या बाईने ती पस्तिशीतील बाई शोधली अन् त्या एकमेकींच्या आधारे आपलं जीवन जगता आहेत असं वाटायला लागतं...!

परंतु असाच एक पन्नाशीतील पुरुष तिथं दिवसभर गरक्या घालत असतो,त्याला लहानपणापासून बघतो त्यामुळं तो जरा ओळखीचा वाटतो.पूर्वी एका सधन घरात तो कामाला होता पण कसा काय माहित नाही पण एक दिवस त्याचा पाय तुटला अन् वॉकरच्या आधाराने तो या दोघीजवळ आला.त्यांनीही कुणी जवळचा असावा अश्याप्रकारे त्याला Accept केले अन् आता तो बऱ्यापैकी चांगला झाला आहे..!

त्यांच्या कामात त्यांना मदत करतो,प्यायला पाणी भरून ठेवतो,त्यांचं अंथरूण पांघरूण रोज त्या बेसमिट असलेल्या ठिकाणी वाळवत घालतो.कधीतरी वाटतं की यांनी त्याला आधार दिला म्हणून तो यांची कामे करतो कदाचित असं असावं.दोघीत भांडणे होत असले की तो त्यांना समजावून पण सांगतो,तो दारू पित नाही अन् तो खूप मेहनती आहे..!

त्याला लहानपणापासून मी बघतो पूर्वी ज्या ठिकाणी तो राहायचा त्या परिसरात नळ आलेले नसल्याकारणाने त्याला कित्येकदा मी आमच्या घराच्याजवळ असलेल्या फिल्टरवरून पाणी भरलेल्या क्यानी लोटगाडीवर लोटत घेऊन जाताना बघितले.नंतर या दोघींची झालेली भेट किंवा पूर्वीचेच यांचे काही नाते आहे का हे सर्व अलबेल आहे पण तो दिवसभर तिथे असतो.मावळतीला कुठे निघून जातो नजरी पडत नाही.तेच सकाळी पाण्याला हंडा घेऊन पळत पळत जाताना दिसतो,तिथे असला की तो नेहमीच पळत असतो,पळत कामे करत असतो.का तेही माहित नाही..!

आत्ताही त्या भांडत आहे कदाचित आज त्या खूप प्यायल्या आहेत,एकमेकांना शिव्या देत आहेत.चूल नेहमीप्रमाणे आजही पेटलेली दिसत नाही,तो इसमही आज दिसेना झालाय.त्यांची कुत्रेही मोठ्याने भुंकत आहे जसे काहीतरी होते आहे पण हे नेहमीचेच असल्यानं त्यांना कुणी बघत नाही,दुर्लक्ष करतात..!

त्या दोघी राहायला एक सारख्या असतात कधीतरी अंघोळ केलेल्या,त्यांचे ते विस्कटलेले केस अन् आमच्या परिसरात आल्या की माझे मग त्यांना जवळून निरखने होते.तेव्हा त्या खूप भरभर बाटल्या गोळा करताना दिसत असतात,तर कधी लाकडे पण त्या कधीच कुणाला खायला मागत नाही किंवा दिले तरी त्या घेत नाही असं का हे ही आजवर कळले नाही..!

त्यांच्याजवळ असलेल्या कुत्र्यांना मात्र त्या पोटच्या पोराला जपावं तसे जपतात त्यातील पस्तिशीतील त्या बाईला कुत्र्यांचा खूपच लळा आहे अन् त्यामुळे ती कुठेही गेली की तिची दोन-तीन कुत्रे ती आगेमागे असतातच.ती पण वेळ असला की त्यांच्याशी खेळत बसते,त्यांना मिठीत घेते,त्यांच्याशी संवाद साधते दारू प्यायली असली की त्यांना घेऊन नाचत असते...!

काही काही समजत नाही त्या दोघींचे पण त्या त्यांच्या या विश्वात खुश असतात.जरी रात्री भांडणे झाले तरी सकाळी सोबत काम त्या दोघी काम करतांना दिसतात.खूप प्रश्न आहे त्यांच्या बाबतीत खूपवेळा विचार केला विचारावं त्यांना पण हिम्मत नाही झाली कधी.कारण माझ्या प्रश्नांनी त्यांना त्रास झाला तर मग काय..? त्यामुळे टाळतो तूर्तच तरी...!
अजूनही भांडत आहेत त्या दोघी बरे काय बोलत असतात फारसे कळतही नाही त्यांचे बोलणे..!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड