मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्य आणि वळणं..!

आयुष्य आणि वळणं..!

सकाळ सरून दुपारचं आभाळ विंडोग्रीलला असलेल्या पडद्याआडून घराच्या आत येतं अन् त्याच्या बरोबर एक अनामिक हुरहुर घराच्या आत येऊन जाते की काय असा भास व्हायला लागतो.भूतकाळ आठवणींचा होतो,वर्तमान काळ भविष्यकाळातील चिंताना घेऊन आणि विंडोग्रीलच्या पल्ल्याड असलेल्या भूतकाळातील आठवणींना मग मन उजाळा देऊ लागते..!

ऑफिसच्या आठवणी,आठवांचा तो काळ धूसर होवून आठवू लागतो.सध्यास्थितीत जगत असलेल्या आयुष्याला घेऊन मग कारणे शोधली जातात अन् आयुष्यात वेळोवेळी आलेलं रिकामपण किती खायला उठतं याचा प्रत्यय येतो.दिवसभरातून कित्येकदा आयुष्याची गणितं जुळवून बघितली जातात,कित्येकदा तारुण्याच्या उंबरठ्यावर वयाला हुलकावणी देऊन जाणारे क्षण आठवून मग टिपूस गाळणं होतं..!

कारण जेव्हा तारुण्याच्या उंबरठ्यावर आपलं वय आपल्याला हुलकावणी द्यायला लागतं,तेव्हा आयुष्यात सर्व गोष्टींना घेऊन स्थिर होणे या अवस्थेचा अर्थ आपल्याला कळायला लागतो..! अन् जेव्हा हा अर्थ अन् त्याच्या बरोबरीने आपल्या आयुष्याची गणितं आपण जुळवू बघत असतो तेव्हा आपल्या आयुष्याला घेऊन आपल्या हाताने किंवा काही इतर कारणास्तव विस्कळीत केलेला भूतकाळ आपल्याला आठवायला लागतो. मग विस्कळीत झालेलं आपलं भवितव्य,ठोकरा खात जगत असलेलं आपलं भविष्य आपल्याला दिसते..!

मुळातच आयुष्याला घेऊन "वेळ" या कधीही न थांबणाऱ्या गोष्टीला घेऊन आपण जीवनाकडे बघू लागतो,तेव्हा बरीच गणितं विस्कळीत झालेली असतात किंवा जन्म मरणाच्या या ट्रॅकवर आपल्या योग्य सूत्रांचा आधार घेऊन ही गणितं वेळीतच सोडवावी लागतात.
अलीकडे ही गणितं सोडतांना बऱ्याचदा तडजोड जाणवत असते पण तारुण्याच्या उंबरठ्यावर हुलकावणी देणारं वय बघितले की शेवटच्या दहा मिनिटाला जसा पेपर सोडवण्यासाठी जशी आपली तडजोड असते तशी या वयात अनुभवायला मिळते आहे..!

बघुयात कारण आयुष्याचा हा पेपर सोडवताना अंताला काहीही महत्त्व नाहीये कारण अंत हा सर्वांचा होणारच असतो.कारण आयुष्यात एक उंचीला जो असतो अन् जो आयुष्यातून आयुष्य जगत असतांनाच उठून गेलेला असतो त्यालाही अंत असतो.म्हणुन तारुण्याच्या उंबरठ्यावर जे काही साधता येईल त्याचाच हिशोब आयुष्यभर होत असतो अन् त्याची वजाबाकी,गुणाकार,भागाकार,बेरीज करत आपण हे आयुष्य जगत असतो.

अंतक्षणी मग कधीतरी खुप काही हाती राहवून आपण जग सोडून जातो तर कधीतरी काहीही न राखून जसे आलो तसे निघून जातो आयुष्याला घेऊन अर्थ या दोन्ही गोष्टींना नाहीये.परंतू आपण मानवाने जगण्याला प्रमाण लावलं आहे अन् त्या प्रमाणात आपल्याला उतरायला हवं नाही तर जगण्याला अर्थ नाही...!

Written by,
Bharat Sonwane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

समुद्राच्या गोष्टी..!Dr. Nishigandha Nikas

समुद्राच्या गोष्टी..! Dr. Nishigandha Nikas  कितीही हुसकावले तरी हे दुःखजर्जर कावळे त्यांच्या सावल्यांच्या गाठी बांधून जातातच माझ्या कुडत्याला त्या सावल्या सोडवता सोडवता किती काटे मोडून घेऊ मी पायात ? आधी किती काटे मोडलेत त्यांचे हिशोब नेमकेच कुठे पूर्ण केले होते मी ! ह्या सावल्यांमुळे, ह्या काट्यांमुळे नक्कीच उशीर होणार मला ! नदीला भेटून, समुद्राच्या गोष्टी पाठवून द्यायच्यात मला ! साधारण आठ दिवसांपूर्वी. डॉ.निशिगंधा यांचा हा काव्यसंग्रह सस्नेह भेट मिळाला. यापूर्वी डॉ.निशिगंधा यांच्याशी बोलण्यातून समुद्राशी एकरूप झालेल्या नदीच्या कथा, कविता अनेकदा ऐकून झाल्या. त्यावर बोलणं झालं. त्यामुळं डॉ.निशिगंधा यांचं नदी आणि समुद्राशी असलेलं प्रेममय नातं कवितेशी किती एकरूप आहे हे जाणून होतो. डॉ.निशिगंधा यांनी जेव्हा हा हस्तलिखित दस्तावेज माझ्या वाढदिवशी मला भेट पाठवला. तेव्हा खरतर अनामिक एक वेगळा आनंद झाला होता. वाढदिवसाला पुस्तकं गिफ्ट पाठवणारी मैत्रीण आयुष्यात असावी असं खूप वाटायचं अन् या वाढदिवसाला ही मैत्रीण वाट्याला आली. खूप आनंद झाला, खरतर या सगळ्यामागे असलेल्या त्यां...

"मला उध्वस्त व्हायचंय"

मला उध्वस्त व्हायचंय..! मला उध्वस्त व्हायचंय..! "मला उध्वस्त व्हायचंय" पद्मश्री कवी दिवंगत नामदेव ढसाळ यांच्या पत्नी मल्लिका अमर शेख यांचं हे आत्मचरित्रात्मक पुस्तक.फावल्या वेळेत वाचलं अन् या पुस्तकाने अनेक अनेक प्रश्न देऊ केले,कवी नामदेव ढसाळ यांची ओळख माझ्या लेखी जी आहे ती म्हणजे विद्रोहाशी भाष्य करणारा हा एक कवी... कवी अन् दलितांच्या (हा शब्द मला इथे योग्य वाटत नाही) हक्कासाठी आपलं उभे आयुष्य देणारा विद्रोही कवी इतकीच काय त्यांच्याशी माझी ओळख.  खरतर हे आत्मचरित्र नसुन,पुरुषप्रधान समाजात स्त्रीची हेटाळणी,समाज पुरुषप्रधान संस्कृतीकडे कुठल्या नजरेने बघतो अन् तीच नजर स्त्रीला समाजात कोणत्या नजरेनं बघते यावर भाष्य करणारं हे पुस्तक.जे की खूप विवादाचे ठरलं,पण यातला वाद-विवाद कश्यासाठी होता..? हा ही एक प्रश्न मला पडला आहे...  तो वाद कवितेच्या पलिकडल्या संसारातील नामदेव ढसाळ यांच्यावर उघडपणे त्यांचा पत्नीने लिहण्यावर होता की,स्त्री बद्दल समाजात जी भावना होती ती कायम राहावी यासाठी होता,हे ही कळून चुकलं नाही.मुळात त्यांनी म्हंटल्याप्रमाणे इथे मला हे ही पटते की,एक कवी,एक च...

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..!

आयुष्यात वेळोवेळी केलेलं Move on..! काही लोकांच्या जगण्याला अन् काही लोकांच्या लिखाणाला असह्यतेचा श्राप असतो,त्यांचं जगणं असो की त्यांचं लेखन करणे असो एक अनामिक हुरहुर अन् एक भटक्या जीवाची भावना त्यांच्या लेखणीतून नियमित सामोरी येत असते..! निरर्थक जगण्याला जसं कुठलंही कारण नसतांना जसं ती व्यक्ती जगत असते अगदी तसंच ती निरर्थक लिहतही असते..! त्या असह्यतेचा श्राप असलेल्या व्यक्तीला रापलेल्या उन्हात लाल मातीच्या फुफाट्यात आपली वाट शोधायला हवी हवीशी वाटते,ती वाट संपूच नये असे वाटते. मरलेल्या काट्या कुट्याच्या रानात त्यांना मनसोक्त मानेवर येणारा घामाचा थेंब टिपत,मुंग्यांनी केलेल्या वारुळला न्याहाळत राहायला आवडतं.नव्यानं बांधलेल्या छोट्या दिमकांच्या बांबिला जवळून हातावर घेऊन हातावर त्यांचे लाड करून घ्यायला आवडतं..! दुपारच्या भर उन्हात लाल मातीच्या वाटेनं चालत असताना,कोरडे शुष्क पडलेल्या तणास सुगंध असल्याची खोटी जाणीव स्वतःला देत त्या कोरडे शुष्क तणास जमिनीशी लगट करून चुंबून घेऊन,त्याचा तो कोरडा शुष्क सुगंध छातीत भरून घ्यायला आवडतं..! उन्हाचे चटके अन् पावसाचे थेंब,हिवाळ्याची थंडी स...