मुख्य सामग्रीवर वगळा

आयुष्य आणि वळणं..!

आयुष्य आणि वळणं..!

सकाळ सरून दुपारचं आभाळ विंडोग्रीलला असलेल्या पडद्याआडून घराच्या आत येतं अन् त्याच्या बरोबर एक अनामिक हुरहुर घराच्या आत येऊन जाते की काय असा भास व्हायला लागतो.भूतकाळ आठवणींचा होतो,वर्तमान काळ भविष्यकाळातील चिंताना घेऊन आणि विंडोग्रीलच्या पल्ल्याड असलेल्या भूतकाळातील आठवणींना मग मन उजाळा देऊ लागते..!

ऑफिसच्या आठवणी,आठवांचा तो काळ धूसर होवून आठवू लागतो.सध्यास्थितीत जगत असलेल्या आयुष्याला घेऊन मग कारणे शोधली जातात अन् आयुष्यात वेळोवेळी आलेलं रिकामपण किती खायला उठतं याचा प्रत्यय येतो.दिवसभरातून कित्येकदा आयुष्याची गणितं जुळवून बघितली जातात,कित्येकदा तारुण्याच्या उंबरठ्यावर वयाला हुलकावणी देऊन जाणारे क्षण आठवून मग टिपूस गाळणं होतं..!

कारण जेव्हा तारुण्याच्या उंबरठ्यावर आपलं वय आपल्याला हुलकावणी द्यायला लागतं,तेव्हा आयुष्यात सर्व गोष्टींना घेऊन स्थिर होणे या अवस्थेचा अर्थ आपल्याला कळायला लागतो..! अन् जेव्हा हा अर्थ अन् त्याच्या बरोबरीने आपल्या आयुष्याची गणितं आपण जुळवू बघत असतो तेव्हा आपल्या आयुष्याला घेऊन आपल्या हाताने किंवा काही इतर कारणास्तव विस्कळीत केलेला भूतकाळ आपल्याला आठवायला लागतो. मग विस्कळीत झालेलं आपलं भवितव्य,ठोकरा खात जगत असलेलं आपलं भविष्य आपल्याला दिसते..!

मुळातच आयुष्याला घेऊन "वेळ" या कधीही न थांबणाऱ्या गोष्टीला घेऊन आपण जीवनाकडे बघू लागतो,तेव्हा बरीच गणितं विस्कळीत झालेली असतात किंवा जन्म मरणाच्या या ट्रॅकवर आपल्या योग्य सूत्रांचा आधार घेऊन ही गणितं वेळीतच सोडवावी लागतात.
अलीकडे ही गणितं सोडतांना बऱ्याचदा तडजोड जाणवत असते पण तारुण्याच्या उंबरठ्यावर हुलकावणी देणारं वय बघितले की शेवटच्या दहा मिनिटाला जसा पेपर सोडवण्यासाठी जशी आपली तडजोड असते तशी या वयात अनुभवायला मिळते आहे..!

बघुयात कारण आयुष्याचा हा पेपर सोडवताना अंताला काहीही महत्त्व नाहीये कारण अंत हा सर्वांचा होणारच असतो.कारण आयुष्यात एक उंचीला जो असतो अन् जो आयुष्यातून आयुष्य जगत असतांनाच उठून गेलेला असतो त्यालाही अंत असतो.म्हणुन तारुण्याच्या उंबरठ्यावर जे काही साधता येईल त्याचाच हिशोब आयुष्यभर होत असतो अन् त्याची वजाबाकी,गुणाकार,भागाकार,बेरीज करत आपण हे आयुष्य जगत असतो.

अंतक्षणी मग कधीतरी खुप काही हाती राहवून आपण जग सोडून जातो तर कधीतरी काहीही न राखून जसे आलो तसे निघून जातो आयुष्याला घेऊन अर्थ या दोन्ही गोष्टींना नाहीये.परंतू आपण मानवाने जगण्याला प्रमाण लावलं आहे अन् त्या प्रमाणात आपल्याला उतरायला हवं नाही तर जगण्याला अर्थ नाही...!

Written by,
Bharat Sonwane

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गावरहाट भटकंती..!

गावरहाट भटकंती..! आज पहाटेच लवकर शहराचं गाव सोडलं अन् काही कार्यक्रमानिमित्त माझं गाव जवळ केलं. गावात आताश्या माझा फार जीव लागत नाही. गाव, गावातली माणसं आता पूर्वीसारखी राहिली नाही. कौलाची, कुडाची शाकरलेली घरं जमीनदोस्त झाली अन् त्यांच्या जागी शहरातील ईमारतींना लाजवतील अश्या नवीन ईमारती उभ्या राहील्या. गावात आलो मायला कार्यक्रम असलेल्या ठिकाणी भाऊबंधाच्या इथे सोडलं अन् दोन-अडीच तास हातात असल्यानं पायीच गावात एकटा भटकत बसलो. दुपारच्या वेळी गावात कुणी नसतं तसं आजही कुणी नव्हतं एखाद-दुसऱ्या पारावर ओट्यावर म्हाताऱ्या बायका डाळीसाळी,गहू हरभरे निवडत बसल्या होत्या. त्यांच्याशी दहा पाच-मिनिटं गप्पा मारत बसलो, गावची जुनी खोडं मला फार ओळखत नाही. मग माझ्या आज्याचं, आज्जीचं नाव सांगितलं की ओळख पोहचती. त्यांना भेटून सावता माळ्याच्या देवळात जाऊन बसलो दुपारच्या रणरणत्या सावलीच्या आडोश्याला म्हातारी माय माऊली झोपी गेले होते. कुणी गप्पा करत बसले होते. त्यांना भेटून बोलून रामराम, श्याम श्याम केला अन् नदीच्या थडीने फिरत बसलो. शर्टाची विन केलेला, काळी बुट घातलेला कोण हा पोऱ्या म्हणून मासे पकडत असलेली शाळे...

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस...

भटक्या मुसाफिर ..!

भटक्या मुसाफिर ..! आयुष्य जगायला उदासवाण्या वाटांशी जवळीक केली की, संवेदनशील मनाची माणसं अजूनच संवेदनशील होऊन जातात. मग आयुष्यात कायमच्या या उदासवाण्या वाटा त्यांच्या वाट्याला येतात मग अडवळणी वाटांना निरुद्देश होऊन, निरर्थक भटकत रहावं तसं भटकत राहणं त्यांच्या उभ्या आयुष्याला लटकून जातं. कित्येकदा मग ते आयुष्य बेभरोशी आणि दहा मिनिटांच्या हौसेखातर केलेल्या रिकामचोट गोष्टीतून पडलेल्या वीर्यभरल्या निरोधासारखं होऊन जातं. आणि मग हे संवेदनशील माणूस, त्याचं हे मन तितकंच सहज नॉर्मल आयुष्यातून उठून जातं किंवा बाजूला फेकल्या जातं. जितक्या सहज शहरातील एकांगी असलेल्या वेड्या बाभळीच्या वनात एखाद्या सावलीच्या आडोश्याला केलेल्या मुतारीत ही विर्यांची निरोधे बेवारशी, हौस पूर्ण होऊन फेकली जातात. हे प्रकरण जुळून आलं असतं तर एखादं गोंडस लेकरू जन्माला आलं असतं. असा भाव, असा विचार बेफिकीर आयुष्य जगणाऱ्या या भटक्याच्या मनात येऊन जातो. अन् मग भयाण, ओंगळवाणे आयुष्य वाट्याला येणं काय असावं..? तर हे असतं. याची प्रचिती त्याला येऊन जाते. आज शनिवार उद्या कंपनीला सुट्टी म्हणून आज दुपारभरल्या निरर्थक असं भ...