मुख्य सामग्रीवर वगळा

गावरहाटी..!

गावरहाटी..!

नेहमीप्रमाणे खूप दिवसांनी पहाटेच्या गारव्यात बापाचं गाव जवळ करायचं,रोजची शहराची झालेली सवय आणि क्युबिकल्सच्या दूनियेपासून काही तासांची सुटका किंवा मनाला पडलेल्या असंख्य प्रश्नांना उत्तरे शोधायची आहे म्हणून मग बापाच्या गावाला जवळ करणं होतं..!

गावाला आलं की मनसोक्त भटकणं होतं,गावाची ओढ अलीकडे फारशी जाणवत नाही पण आठ-दहा दिवस झाले की शिवनामायची आठवण येते.तिच्या तिरावर असलेल्या हेमाडपंती संगमेश्र्वर बोलावतो आहे असे भास होतात.मग कधी एकदा जावून त्याच्या प्रांगणात मला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं सोडवतो असे होते,कारण काही प्रश्नांची उत्तरे हेमाडपंती संगमेश्र्वराच्या प्रांगणात ध्यानस्थ बसले की मगच सुटतात..!

पहाटे आठच्या सुमाराला गावाला आलं की मग नदीच्या तीरावर चालत राहायचं,थंडीचे दिवस असल्यानं शिवनामायच्या वाहत्या पाण्यावर वाफ तरंगत असताना डोळ्यांना नजरी पडत आहे.रात्रीच्या सोसाट्याच्या वाऱ्याने वाटेवर गुलमोहराच्या फुलांचा पडलेला सडा अन् डोईवर गुलमोहराचा मंडप,नदीच्या तीरावर बोडक्या झालेल्या बाभळी हिरवाईने नटलेल्या आहे,पिवळ्या फुलांचा होत असलेला डोईवर वर्षाव,रानमोगऱ्याचा वाटेनं येणार सुगंध अन् निवांत वाहणारे पाणी,जलक्रीडा करणारे बदके,बगळे बघत चालत राहायचं..!

हेमाडपंती संगमेश्र्वराचं देऊळ जवळ आलं की,नदीच्या थडीला बांधलेल्या पायऱ्यांवर बसून नदीत तळ पाय बुडवून न्याहाळत राहायचं.जोवर पहाटेची थंडी अंगातून जात नाही अन् कोवळे ऊन अंगावर येत नाही तोवर,टिपत राहायचं डोळ्यांनी शिवनामायच्या वाहत्या पाण्यातील हालचालींना,झाडांच्या सावल्याना,अंदाज बांधत रहायचे आयुष्याचे,संदर्भ जोडत रहायचे आयुष्याचे शिवनामायच्या संगतीने आपल्या आयुष्याचे..!

पहाटेचे कोवळे उन्ह अंगावर आले की वाहत्या पाण्यातून तळवे काढून मातीचा गारवा अनुभवायचा अन् शिवनामायला चंदनतिलक,कुंकम वाहून मनोभावे प्रार्थना करून हेमाडपंती संगमेश्र्वराच्या देऊळाची वाट जवळ करायची.आता पर्यंत बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मिळाली असतात,आयुष्याला घेऊन आपण किती विचार करतो अन् ते सर्वच किती गौण आहे हे इथे आलं की कळून चुकते..!
आपण आयुष्यभर अपेक्षेचे ओझे वाहत राहतो अन् एक दिवस शिवनामायच्या वाहत्या पाण्याच्या प्रवाहात आपलीच राख करून वाहवून घेतो अन् मग एक वर्तुळ पूर्ण होतं ज्याच्या दिश्या हरवलेल्या असतात आयुष्याच्या उत्तरार्धातसुद्धा..!

मग हेमाडपंती संगमेश्र्वराचं देऊळ आलं की,मनोभावे संगमेश्र्वराच्या पिंडीशी आपण नतमस्तक व्हावं.गाभाऱ्यात तासनतास कुणी येत नसल्यानं इथे खूप सहज समाधी लागून जाते अन् मग काळोखात डोळ्यांना अजूनच काळोख जाणवतो,डोळे उघडे करून बघण्याचा प्रयत्न करूनही बराच वेळ उघडत नाही अन् मग कितीवेळ शांत चित्ताने बसून राहावं.आपल्या आयुष्यात काय चालू आहे,आपण का जगतो,काय करायचं आयुष्यात,भविष्याचे काय हे कुठलेही प्रश्न मग पडत नाही ध्यानस्थ बसून राहायचं फक्त..!

देवाचं माहित नाही पण इथली शांतता मनाला हवी असते म्हणून असं अधून मधून येणं होत असतं..!

देवळाच्या प्रांगणात कितीवेळ बसून राहायचं,शिवनामायला डोळ्यात सामावून घेत राहायचं,निसर्गावर प्रेम करत राहायचं.जोवर श्वास चालू आहे तोवर हे अनुभवणे कायम असेल कारण आयुष्याची बरीच कोडी इथे आलं की आपसूक सुटून जातात आणि मग वाटेला लागलो की पुन्हा एकदा आयुष्याकडे नव्याने सर्व ठीक होईल ही आशा घेऊन बघणं होतं. मग पुन्हा एकदा जगण्याला कारण भेटते...!

Written by,
Bharat Sonwane.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!

गोष्ट आस्तेचा विषय असलेल्या भाषा,संस्कृती जतन संवर्धनाची..!  काही दिवसांपूर्वी जगाच्या पाठीवर एका सभ्यतेचा,संस्कृतीचा अंत झाला "मैन ऑफ द होल" कोण होता ? काय करत होता ? कसं आयुष्य जगत होता ? त्याचं राहणीमान कसं होतं ? हे आपल्याला काही माहीत नाही. अक्षरशः त्याचं नाव काय होतं हे ही आपल्याला माहीत नव्हतं,आपणच त्याला तो खड्डे खोंदायचा म्हणून "मैन ऑफ द होल" हे नाव दिलेलं.जे त्याच्या उभ्या हयातीत त्यालाही माहीत नव्हते. २६ वर्ष तो एकटाच भटकत राहिला अॅमेझोनच्या जंगलात, अनेकदा त्यालाही त्रास देण्यात आला. परंतु जेव्हा ब्राझील सरकारला हे कळले की तो त्या जमातीतील शेवटचा माणूस उरला आहे, तेव्हा मात्र त्याला संरक्षण देण्यात आलं. तो राहत असलेला भाग संरक्षित क्षेत्र म्हणून संरक्षित करण्यात आला. त्याच्या जाती-जमातीतील तो शेवटचा व्यक्ती ज्याला "जगातला सर्वात एकटं राहणारा माणूस" म्हणून ओळखल्या जात असे. २३ ऑगस्टला ब्राझीलमध्ये त्याचे निधन झाले. ब्राझीलच्या जंगलात गेली २६ वर्ष तो एकटा वेगवेगळ्या ठिकाणी राहत होता. अखेर २३ ऑगस्ट रोजी पालापाचोळ्यापासून बनवलेल्या त्याच्य

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..!

Gautala Wildlife Sanctuary आणि बरच काही..! खास संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक पर्यटकांच्या आग्रहास्तव कन्नड तालुक्यातील पर्यटन स्थळांची एकत्रित संपूर्ण माहिती देण्याच्या विनंतीस मान देऊन हा कन्नड तालुक्यातील गौताळा अभयारण्य,कन्नड शहर,अंबाडी प्रकल्प,कालीमठ येथील कालिका माता मंदिर,पितळखोरा लेणी,पाटणा देवी मंदिर,सुरपळा डोंगररांगा,कन्नड चाळीसगाव घाट परिसर या आणि इत्यादी सर्व पर्यटन स्थळांची माहिती एकाच लेखात संकलीत करून देण्याचा प्रयत्न केला आहे..!   औरंगाबादपासून ७५ कि.मी अंतरावर असलेले गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात येते.आपण पावसाळ्यात निसर्गसहलीसाठी,ट्रेकिंगसाठी आवर्जून भेट द्यावं असंच हे अभयारण्य. डोंगरदऱ्यांच्या कपारी,खाणीतून वाट काढत उंचावरुन कोसळणारे धबधबे,पुढे त्याच धबधब्याचे होणारे चंदन नाल्यासारख्या नाल्यात होणारे रूपांतर.उंचच उंच हिरवीगार वनराईने नटलेली डोंगरे डोळ्याचे पारणं फेडतात.पावसाळा लागला की पर्यटनासाठी पर्यटक वर्ग मोठ्या प्रमाणात गौताळा अभयारण्याला भेट द्यायला दरवर्षी येत असतो. आपणही या ठिकाणी एकदा येऊन या ठिकाणाला भेट द्यावी,जेणेकरून निसर्गाने दिलेलं सर्वस्व आ

एकटेपणाचा सहवास..!

एकटेपणाचा सहवास..! हजारो माणसांच्या सहवासात जेव्हा आपल्याला एकटेपणाची जाणीव होईल किंवा एकटं वाटेल तेव्हा माणसांच्या सहवासात आपण जगत असलेलं आयुष्य सोडून,मनाच्या तळाशी चालू असलेल्या असंख्य विचारांना घेऊन मनाचा तळ घाटायचा आणि झोकून द्यायचं स्वतःला त्या खोल दरीत.जिथवर सामान्य व्यक्तीचं विचारांनीसुद्धा पोहोचणं शक्य नसेल..! कारण हजारो माणसांच्या सहवासात एकटं वाटणारी व्यक्ती विचारांनी सामान्य अन् मनाने नॉर्मल असणारी नाहीये.तिच्या आत एकाचवेळी असंख्य गोष्टींचा विचार,कल्पना करणारी माणसं त्या व्यक्तीच्या मनावर विचारांनी स्वार झालेली असतात..! अशी माणसं ओळखणे खूप सहज अन् सोप्पे आहे.परंतु त्यांच्या मनात चालू असलेल्या असंख्य गोष्टींचा तळापर्यंत पोहचून त्या व्यक्तीच्या मनात काय चालू आहे हे नॉर्मल आयुष्य जगणाऱ्या व्यक्तींना ओळखणे सहज सोप्पे असे नाही..! अश्या माणसांना काळोख जवळचा वाटतो,भर दुपारच्याभरात त्यांना उन्हं असतांना डोंगरदर्यातील कपार्यांच्या सहवासात झळया तुटण्याऱ्या उन्हाला न्याहाळणे आवडते. डोंगरातील मातीला घामेजलेल्या हातात घेऊन खाली टाकून द्यायला आवडतं,तिचं उष्ण असणं अनुभवायला आवड